शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

साडेचार एकरातील उभे धानपीक जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 9:56 PM

यंदा पावसाने पाठ फिरविल्याने रोवणी लांबली होती. त्यातच धानपीक ऐन कापणीच्या हंगामात असताना त्यावर कीडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने धानाची पूर्णत: तणस झाली आहे.

ठळक मुद्देशेतकरी त्रस्त : धानोली येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : यंदा पावसाने पाठ फिरविल्याने रोवणी लांबली होती. त्यातच धानपीक ऐन कापणीच्या हंगामात असताना त्यावर कीडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने धानाची पूर्णत: तणस झाली आहे. धानपिकांवरील कीडरोगांनी त्रस्त झालेल्या दोन शेतकºयांनी साडेचार एकरातील उभे धानाचे पीक जाळले. ही घटना रविवारी (दि.१२) तालुक्यातील धानोली येथे घडली. या घटनेमुळे तालुक्यातील शेतकºयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.दुर्योधन मनीराम गौतम व जयराम शिवशंकर कटरे, रा.धानोली अशी कीडरोग आणि नैसर्गिक संकटांना कंटाळून शेतातील धान पिकाला आग लावणाºया शेतकºयांची नावे आहेत. दुर्योधन गौतम यांनी अडीच एकरातील तर जयराम कटरे यांनी दोन एकरमधील धानपीक जाळून टाकले. यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने बºयाच शेतकºयांना रोवणी करता आली नाही. तर काही शेतकºयांनी उपलब्ध सिंचनाच्या सोयीच्या मदतीने कशी बशी रोवणी आटोपली. मात्र कीडरोगांमुळे हाती आलेले पीक गमविण्याची वेळ शेतकºयांवर आली. त्यामुळे शेतकरी नैराश्यात आहे. हजारो रुपयांचा लागवड खर्च करुनही काहीच हाती लागण्याची शक्यता कमी आहे. यामुळेच या दोन शेतकºयांनी शेतातील उभे धानपीक जाळल्याचे बोलल्या जाते. ही केवळ या दोन शेतकºयांची व्यथा नसून तालुक्यातील अनेक शेतकºयांची हीच स्थिती आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी, धानोली, बोळुंदा, थाडेझरी, बेहळीटोला या गावातील शेतकºयांनी ५० टक्के धानाची रोवणी केली नाही. केवळ ज्यांच्याकडे सिंचनाची सोय होती. अशाच शेतकºयांनी इतर शेतकºयांना मदत करुन धानाची लागवड केली.पंचनामे करुन नुकसान भरपाई द्याधानोरी येथील ७०० एकर शेतीपैकी केवळ १२५ एकरवर धानाची लागवड करण्यात आली. थाडेझरी येथील २५० एकर शेतजमीन असून केवळ १० एकरात धानपिकाची लागवड करण्यात आली. शेतकºयांनी काढलेल्या पीक विम्याचाही फायदा शेतकºयांना मिळाला नाही. तसेच नुकसान भरपाई देखील मिळाली नाही. प्रशासनाने पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.