शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' ! महिला सुरक्षेसाठी अजित पवारांचा 'पंचशक्ती' निर्णय
2
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
3
"वृद्धांना तरुण करू"; टाईम मशीनच्या जाळ्यात अडकले हजारो लोक, जोडप्याकडून कोट्यवधींचा गंडा
4
Amitabh Bachchan : "मी दिवसाला २०० सिगारेट ओढायचो, पण आता..."; 'असं' बदललं अमिताभ बच्चन यांचं आयुष्य
5
IPO असावा तर असा, लिस्टिंगच्या दिवशीच पैसा दुप्पट; आता Shares खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
7
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
8
दिवसभर भीक मागायचे अन् रात्री हॉटेलात मुक्काम करायचे; २२ भिकाऱ्यांना पोलिसांनी पकडले
9
२ लाख कॅश, ३०० ग्रॅम सोनं, ११ किलो चांदी, १३ प्लॉट...; IAS अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड
10
Iran Isreal Tension : इस्त्रायलचा मारा सहन करू शकेल का इराण; जाणून घ्या देशाच्या अर्थव्यवस्थेची काय आहे स्थिती?
11
"आज कुछ तुफानी करते है!" Martin Guptill चा कडक सिक्सर; फुटल्या कॉमेंट्री बॉक्सच्या काचा!
12
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
13
२००० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाचा सूत्रधार काँग्रेसचा माजी पदाधिकारी; कोकेन प्रकरणात मोठा खुलासा
14
Bigg boss 18 मध्ये येणार 'तारक मेहता...'चा सोढी? महिनाभर बेपत्ता झालेल्या गुरुचरण सिंहचं नाव चर्चेत
15
Iran-Isreal तणावात गुंतवणूकदारांचे ₹५.६२ लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्सचा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये; निफ्टीही आपटला
16
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
17
तेलंगणा मंत्र्याचे समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटावर आक्षेपार्ह विधान, अभिनेत्रीची संतप्त पोस्ट
18
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
19
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची माहिती समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
20
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...

रब्बीसाठी प्रकल्पाचे पाणी मिळणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 9:57 PM

जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी पीक घेतले जाते. मात्र यंदा बाघ व इटियाडोह विभागाने गोंदिया, आमगाव व सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बीसाठी पाणी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देशेतकरी संकटात : प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी पीक घेतले जाते. मात्र यंदा बाघ व इटियाडोह विभागाने गोंदिया, आमगाव व सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बीसाठी पाणी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट केले आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा असून हे पाणीे रब्बी पिकासाठी दिल्यास जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या बिकट होण्याची शक्यता आहे.मागील वर्षी जिल्ह्यातील ३ हजार हेक्टरमधील रब्बी पिकांना बाघ प्रकल्पाने पाणी दिले होते.याचा गोंदिया, आमगाव, सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ झाला होता. दरवर्षी नहराच्या माध्यमातून सिरपूर जलाशयाचे पाणी दिले जाते.मात्र सध्यास्थितीत या प्रकल्पात केवळ २५.७० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर पुजारीटोला, कालीसरार जलाशयात अनुक्रमे केवळ ७०.१० व ६९.४२ टक्के पाणीसाठा आहे. हे पाणी सिरपूर जलाशयात सोडल्यानंतर सुध्दा रब्बी पिकांसाठी पाणी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या सिरपूर जलाशयाचे पाणी गोंदिया शहरासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी शहरात पाणी टंचाई निर्माण झाली होती तेव्हा याच जलाशयाची गोंदियावासीयांना मदत झाली होती.नहराच्या दुरुस्तीवर १३० कोटीचा खर्चयावर्षी बाघ प्रकल्पाव्दारे नहरातून पाण्याचा पुरवठा करण्यात येणार नाही. सध्या नहराच्या दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. यासाठी १३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर या कामाला सुरूवात केली जाणार आहे. हे पाणी रोटेशन पध्दतीने दिले जाणार असून यासंदर्भात नुकतीच पाणी वापर सहकारी संस्थाची नुकतीच एक बैठक पार पडली.- हेमराज छप्परघरे, कार्यकारी अभियंता बाघ व इटियाडोह विभाग, गोंदिया

टॅग्स :water shortageपाणीटंचाई