शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

१० हजार रुपये तात्काळ द्या

By admin | Published: June 28, 2017 1:15 AM

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. बळीराजा पावसाची आतुरतेने वाट बघत असून चिंतातूर आहे.

शेतकऱ्यांना केवळ दिलासा : विलंबामुळे रोवणीची वेळही निघणार लोकमत न्यूज नेटवर्क काचेवानी : पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. बळीराजा पावसाची आतुरतेने वाट बघत असून चिंतातूर आहे. त्याच्यासमोर सर्वात मोठी समस्या शेतीसाठी लागणाऱ्या आर्थिक समस्येची आहे. शासनाच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लहर होती. मात्र आजपर्यंत कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांना होकार दिला नसल्याने नाराजी पसरली आहे. शेतकऱ्यांना कर्ज मिळावे यासाठी जि.प. सदस्य मनोज डोंगरे व माजी आ. दिलीप बन्सोड यांच्या दारी सतत शेतकऱ्यांचा डेरा दिसून येत आहे. मात्र शेतकऱ्यांना कधी यश मिळेल, हे स्पष्ट सांगता येत नाही. शेतकऱ्यांना सरसकट १० हजार रूपये कोणतीही अट न घालता सातबारा पाहून पीक कर्ज देण्यात यावे. वेळ निघाल्यानंतर पैसे दिल्याने शेतकऱ्यांना बियाणे घेता येणार नाही, असे मत जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी व्यक्त केले. माजी आ. दिलीप बन्सोड यांच्या घरी शेतकऱ्यांची सभा घेण्यात आली. या वेळी शेतकऱ्यांसह अनेक गावांचे सरपंच व उपसरपंच प्रामुख्याने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेवून भविष्यात शेतकऱ्यांचे संकट वाढणार असून वर्तमान शासन कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचे माजी आ. बन्सोड यांनी उपस्थितांना पटवून दिले. पाऊस खोळंबल्याने धान पेरणीला एक महिना विलंब झालेला आहे. या समस्येमुळे शेतकरी चिंतातूर आहेत. ज्यांनी कर्जाची रक्कम परतफेड केली नाही, त्यांना शासनाच्या घोषणेनुसार मदत मिळावी यासाठी प्रयत्नात आहेत. मात्र अद्याप एकाही शेतकऱ्यास १० हजार रूपये मिळण्याची बाब माहीत झाली नाही, असे माजी आ. बन्सोड म्हणाले. घोषणेनुसार शासनाने तात्काळ शेतकऱ्यांसाठी मदतीची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा देत वेळ काढण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना मिळेल तेव्हाचा मिळाला असे समजून शेतीच्या कामाकडे लक्ष घालावे, असा सल्लाही त्यांनी दिला. वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांना कर्जमुक्तीची गरज राज्य किंवा केंद्र शासनाचे कर्मचारी शेती करतात. कोणतीही सरकार कोणत्याही कर्मचाऱ्यास अधिकचे वेतन देत नाही. शेतीच्या उत्पादनात सहकार्य करावे, यासाठी कर्ज काढून शेती करतात. शेतीसाठी अशा हजारो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. शेतीतून त्यांना निराशाच हाती लागली. हे कर्मचारी शेतीकर्ज व पगार तारण कर्जात गुंतलेले आहेत. तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांंना मोठा पगार नसून त्यांना कर्जमुक्तीतून वगळणे, हे शासनाचे चुकीचे निर्णय आहे. त्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ द्यावा, असे माजी आ. दिलीप बन्सोड म्हणाले.