शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

वैनगंगा नदी काठावरील गावांना प्रकल्पाचे पाणी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 21:45 IST

यावर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाचा अभाव आणि कीडरोगांमुळे शेतकऱ्यांना हाती आलेले पिके गमवावी लागली. त्यामुळे रब्बी हंगामातून खरीपातील नुकसान भरपाई भरुन काढू, असा मानस शेतकऱ्यांचा आहे.

ठळक मुद्देशेतकºयांसमोर संकट : प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : यावर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाचा अभाव आणि कीडरोगांमुळे शेतकऱ्यांना हाती आलेले पिके गमवावी लागली. त्यामुळे रब्बी हंगामातून खरीपातील नुकसान भरपाई भरुन काढू, असा मानस शेतकऱ्यांचा आहे. त्यासाठी वैनगंगा काठावरील गावांना रब्बी हंगामासाठी पाणी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पामध्ये मोजकाच पाणी साठा आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे शेतकºयांना रब्बी हंगामात धानाची लागवड न करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. हा नियम केवळ गोंदिया जिल्ह्यातच लागू करण्यात आल्याचे बोलल्या जाते. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता रब्बी हंगाम व उन्हाळी पिकांसाठी धापेवाडा प्रकल्पाचे पाणी वैनगंगा नदी काठावरील गावांना देण्यात यावे. अशी मागणी चांदोरी खुर्द, सावरा, पिपरिया, अर्जुनी, बिहिरीया, इंदोरा बु. करटी खुर्द, पुजारीटोला, महालगाव, मुरदाडा, बोंडरानी, सालेटोला, कवलेवाडा येथील शेतकऱ्यांनी केली आहे. खरीपातील पिकांचे पाऊस आणि कीडरोगांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम नाही. हाती आलेले पीक पावसाअभावी गमवावे लागल्याने शेतकºयावर आर्थिक संकट ओढावले आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेता सिंचन प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवून उर्वरित पाणी रब्बी आणि उन्हाळी धान पिकांसाठी देण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत कवलेवाडा, धादरी, बेलाटी, मुंडीपार, चिरेखनी, बेलाटी या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पात सद्यस्थितीत ३६ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. ७ मीटर पाणी बाहेर वाहत आहे. महिनाभरात वाहून जाणारे १ लाख १० हजार घन मिटर पाणी अडविणे शक्य आहे. त्यासाठी आतापासून पाणी साठवून ठेवल्यास पाणी टंचाईच्या समस्येवर व शेतकºयांच्या पाणी समस्यावर मात करणे शक्य आहे. शेतकºयांना पाणी दिल्यास शेतकऱ्यांना उत्पन्न घेण्यास मदत होईल.टप्पा-२ द्वारे सर्व तळ्यात पाणीधापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प टप्पा-२ ची निर्मिती करण्यात आली आहे. यातून खळंबदा जलाशयात व परिसरातील पाणी देणे शक्य आहे. मात्र कुठल्याही तलावात पाणी सोडले जात नाही. खैरबंदा जलाशयात फक्त पावसाळ्यात आठ दहा दिवस अल्प प्रमाणात पाणी सोडण्यात आले व बंद करण्यात आले. तलाव कोरडे पडले आहेत. ज्या उद्देशाने निर्मिती करण्यात आली तो उद्देश देखील साध्य होत नसल्याचे चित्र आहे.पाणीटंचाईवर मात शक्यरब्बी व उन्हाळी धान पिकासंबंधित धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गावांना व नदी काठावरील गावांना पाणी दिल्यास विहिरी, बोअरवेल, तळ्याच्या पाणी साठ्यात वाढ होईल. यामुळे पाणी टंचाईवर मात करणे शक्य होईल. पावसाळ्यात ३० मि.मी. व उन्हाळ्यात ३५ दलघमी पाणी लागते. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन केल्यासपाणीटंचाईच्या समस्येवर मात करुन उन्हाळी पिकांना पाणी देणे उपसा करणे शक्य होईल.