शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
2
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
3
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल
4
Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड
5
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
6
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
7
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
8
बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना
9
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
11
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
12
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
13
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
14
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
15
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
16
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
17
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
18
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
19
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
20
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार

गोंदिया वनविभागात ८० टक्के रोपटी जिवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:52 AM

राज्य शासनाच्या वृक्षारोपण अभियानांतर्गत केलेल्या रोपट्यांचे योग्य संवर्धन न केल्याने कोट्यवधी रूपये व्यर्थ जात असल्याची ओरड होत आहे;

वृक्षारोपणाने गिधाडीचे बदलतेय रुप : ओसाड परिसरात पसरत आहे हिरवळलोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : राज्य शासनाच्या वृक्षारोपण अभियानांतर्गत केलेल्या रोपट्यांचे योग्य संवर्धन न केल्याने कोट्यवधी रूपये व्यर्थ जात असल्याची ओरड होत आहे; मात्र गोंदिया जिल्हा याला अपवाद ठरला असून रोपण केलेली ८० टक्के रोपटे जिवंत असल्याने या परिसराचे रुप बदलत असल्याचे चित्रआहे.पर्यावरणाच्या संवर्धन व संतुलनाच्या दृष्टीने सन २०१६ मध्ये १ जुलैला राज्य शासनाने दोन कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला. यातंर्गत जिल्ह्यात ९ लाख ६३ हजार ६०० रोपट्यांची लागवड केली होती. यापैकी आठ लाख ९६ हजार ३८३ रोपटे जिवंत असल्याची हमी जिल्हा प्रशासनाने दिली होती. वन विभागाद्वारे ७४ ठिकाणांवर सात लाख ४८ हजार रोपट्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले होते. यापैकी सात लाख २५ हजार ९३८ (९७ टक्के) रोपटे जिवंत असल्याचा दावा प्रशासनाद्वारे करण्यात आला होता. पण, लागवड केलेल्या रोपट्यांपैकी ८० टक्के रोपटे शिल्लक होते. परंतु मृत रोपट्यांच्या जागी नवीन रोपटे लावण्यात आले आहेत. यावर्षी चार कोटी वृक्षारोपण अभियानांतर्गत वन विभागाद्वारे आठ लाख ४६ हजार ८५९ रोपटे लावण्यात आले. गोरेगाव वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव यांच्यानुसार, विभागाजवळ सद्यस्थितीत सात लाख रोपटे तयार आहेत. गोरेगाव वन विभागाच्या नर्सरीमध्ये ३५ हजार रोपटे उपलब्ध आहेत. गिधाडी वन परिक्षेत्रात दोन कोटी वृक्षारोपण अभियानांतर्गत ३३ हजार ९०० रोपटे लावण्यात आले होते. २० टक्के मृत रोपट्यांच्या जागेवर नवीन रोपटे लावण्यात आले आल्याचे सांगण्यात आले आहे. वनात सोनी-चिल्हाटी या सात-आठ गावांतील महिला बचत गटांच्या माध्यमातून सागवान, आवळा, बेल, हिरडा, बेहडा, जांभूळ आदींचे रोपटे लावण्यात आले. त्यांचे संगोपणही केले जात आहे.