शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राष्ट्रीय लोकअदालतीत दहा हजार प्रकरणांचा निपटारा, ४ कोटी २० लाखांची वसुली, ९२१ फौजदारी प्रकरणे निकाली

By नरेश रहिले | Updated: December 10, 2023 14:15 IST

Gondia News: वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले सामोपचाराने व सामंजस्याने तत्काळ निकाली काढण्यासाठी रविवारी (दि.९) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया येथे व सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

- नरेश रहिलेगोंदिया - वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले सामोपचाराने व सामंजस्याने तत्काळ निकाली काढण्यासाठी रविवारी (दि.९) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया येथे व सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत १० हजार ८१ प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला.

राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष ए. टी. वानखेडे, सचिव एस. व्ही. पिंपळे, जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. खान, जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एन. डी. खोसे, तदर्थ न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एन. बी. लवटे, दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) आर.एस.कानडे, मुख्य न्यायदंडाधिकारी ए. व्ही. कुलकर्णी, कामगार न्यायाधीश वाय. आर. मुक्कणवार, सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. आर. मोकाशी, दुसरे सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ रतर एस. एस. धपाटे, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व्ही. ए. अवघडे, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एम. बी. कुडते, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर वाय. जे. तांबोली, ५ वे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस. डी. वाघमारे, ६ वे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर टी. व्ही. गवई, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष सी. के. बडे उपस्थित होते.

लोकअदालतीत या प्रकरणांचा निपटाराजिल्हयातील एकूण न्यायालयात प्रलंबित दिवाणी ६८० प्रकरणांपैकी ६१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये १ कोटी ४२ लाख ६ हजार ९४५ रुपये वसुलींचे प्रकरणे निकाली काढण्यात आले. न्यायालयात प्रलंबित २,५०६ फौजदारी प्रकरणांपैकी ९२१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. २ कोटी ८ लाख ८४ हजार ८३८ रुपये वसुलींचे प्रकरणे निकाली निघाली. लोकअदालतमध्ये ठेवण्यात आलेले पूर्वन्यायप्रविष्ट १९,०८३ प्रकरणांपैकी ९०९९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये ६९ लाख ६५ हजार २० रुपयांची वसुली झाली. एकूण २२ हजार २६९ ठेवलेल्या प्रकरणापैकी १० हजार ८१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. एकूण ४ कोटी २० लाख ५६ हजार ८०३ रुपये वसुली झाली.

पक्षकारांचा मानसिक व आर्थिक त्रास वाचलास्पेशल ड्राइव्ह अंतर्गत जिल्ह्यातील न्यायालयामध्ये एकूण १३०७ फौजदारी प्रकरणे आली होती. त्यापैकी ७८७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामुळे पक्षकार व इतरांना होणारा मानसिक व आर्थिक त्रास यामधून सुटका मिळाली.

टॅग्स :Courtन्यायालयLokadalatलोकअदालत