शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

रोहयोच्या कामात विभागात गोंदिया पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2016 1:55 AM

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत नागपुर विभागात गोंदिया जिल्हा माघारला आहे.

चंद्रपूर आघाडीवर : जिल्ह्यातील ५१.९६ टक्के काम अपूर्णगोंदिया : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत नागपुर विभागात गोंदिया जिल्हा माघारला आहे. गोंदिया जिल्ह्याची स्थिती या योजनेप्रती यावर्षी दयनिय आहे. जिल्ह्यात मनेरगा अंतर्गत करण्यात येणारे ५१.९६ टक्के काम अपूर्ण आहेत. या शिवाय चंद्रपुर जिल्ह्यात या योजनेतील कामांना उदंड प्रतिसाद असून तेथील फक्त २९.३३ टक्के काम अपूर्ण आहेत.मनरेगा अंतर्गत सन २०१३-१४, २०१४-१५ व २०१५-१६ मध्ये गोंदिया जिल्ह्यात २४ हजार ८७९ काम सुरू झाले. यातील ११ हजार ९५२ म्हणजे ४८.०४ टक्के कामे सुरू झाली असून १२ हजार ९२७ कामे म्हणजेच ५१.९६ टक्के कामे अपूर्ण आहेत. मनरेगाच्या कामात आघाडीवर असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यात मागील तीन वर्षात २५ हजार ७४७ कामे सुरू झाली असून १८ हजार १३६ कामे म्हणजेच ७०.६७ टक्के काम पुर्णत्वास गेली आहेत. तर ७ हजार ५५१ म्हणजेच २९.३३ कामे अपुर्ण आहेत. गोंदिया नंतर गडचिरोली जिल्ह्याचा क्रमांक लागत आहे. गडचिरोली जिल्ह्यात ३२ हजार ८१४ कामे सुरू झाली असून त्यात १५ हजार ९५८ म्हणजेच ४८.६३ टक्के कामे पूर्ण आहेत. तर १६ हजार ८५६ म्हणजेच ५१.३७ टक्के कामे अपूर्ण आहेत. भंडारा जिल्ह्यात सुरू झालेल्या २९ हजार २३३ कामांपैकी १८ हजार ६०६ म्हणजेच ६३.६५ कामे पुर्ण झाली आहेत. तर १० हजार ६२७ म्हणजेच ३६.३५ टक्के कामे अपुर्ण आहेत. तसेच नागपूर जिल्ह्यात २६ हजार २७८ कामे सुरू असून यातील १६ हजार ९८४ म्हणजेच ६४.६३ टक्के कामे पुर्ण झाली आहेत. तर ९ हजार २९४ कामे म्हणजेच ३५.६३ टक्के कामे अपुर्ण आहेत. वर्धा जिल्ह्यात ४६ हजार ३३१ कामे सुरू असून ३० हजार ४३५ म्हणजेच ६५.६९ कामे पुर्ण झाले आहेत. तर १५ हजार ८९६ म्हणजेच ३४.३१ टक्के कामे अपुर्ण आहेत. (तालुका प्रतिनिधी)