शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गोंदिया,तिरोडा तालुक्यातील गावांना पुराचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:37 IST

वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याची घटना २००६ मध्ये घडली होती. त्यानंतर यंदा म्हणजे तब्बल १३ वर्षांनंतर तशीच पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.धापेवाडा, अत्री, चांदोरी खुर्द, मुरदाडा,किडंगीपार,घाटकुरोडा तर गोंदिया तालुक्यातील पुजारीटोला,कासा, ब्राम्हणटोला, ढीवरटोली, डांर्गोली येथील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ठळक मुद्देवैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ : आठ मार्ग बंद, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा लागली कामाला

पिकांचे नुकसानवैनगंगा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील शेतामध्ये साचल्याने रोवणी वाहून जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रविवारी रात्रीपासून हजारो हेक्टरमधील धानपिके पाण्याखाली असल्याने नुकसानीच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.१३ वर्षांनंतर प्रथमच पूर परिस्थितीवैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याची घटना २००६ मध्ये घडली होती. त्यानंतर यंदा म्हणजे तब्बल १३ वर्षांनंतर तशीच पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.धापेवाडा, अत्री, चांदोरी खुर्द, मुरदाडा,किडंगीपार,घाटकुरोडा तर गोंदिया तालुक्यातील पुजारीटोला,कासा, ब्राम्हणटोला, ढीवरटोली, डांर्गोली येथील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.गावकऱ्यांमध्ये रोषतिरोडा तालुक्यातील नदी काठालगत असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीचे पाणी साचले आहे. मात्र याची माहिती मिळाल्यानंतर तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी कुठलाच संपर्क न केल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.धापेवाडा येथे घरांमध्ये साचले पाणीतिरोडा तालुक्यातील धापेवाडा हे गाव वैनगंगा नदीच्या तीरावर वसले असून वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने या गावातील काही घरांमध्ये पाणी साचल्याची माहिती आहे.तर काही ठिकाणी घरांची सुध्दा पडझड झाली आहे.धरणाचे दरवाजे केले बंदसालेकसा तालुक्यातील पुजारीटोला, कालीसराड धरणाचे दरवाजे रविवारी उघडण्यात आले होते.त्यामुळे काही मार्ग बंद झाले होते.मात्र सोमवारी सकाळी या दोन्ही धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले. इटियाडोह धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.१०६ सहा नागरिकांना हलविलेवैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गोंदिया तालुक्यातील ढिवरीटोली गावात पाणी शिरले.यामुळे येथील गावकऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन विभागाने बोटीच्या मदतीने बाहेर काढले. तसेच तिरोडा तालुक्यातील किडंगीपार येथील १०६ नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले. या नागरिकांना गोंडमोहाडी येथील लक्ष्मणराव मानकर आदिवासी आश्रम शाळेत ठेवण्यात आले.चार मजुरांना काढले सुखरुप बाहेरसोमवारी वैनगंगा नदीच्या पात्रात अचानक वाढ झाल्याने गोंदिया तालुक्यातील किन्ही येथील रेतीघाटावर काम करीत असलेले चार मजूर अडकले होते. त्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने रेस्क्यू ऑपरेशन राबवून सुखरुप बाहेर काढले.यात दिलीपसिंह मोहनसिंह गौर, संदीप यादव, रुहमसिंग सैनी, सुनिलसिंग या चार जणांचा समावेश आहे.

टॅग्स :floodपूर