शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
2
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
3
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
4
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
5
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
6
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
7
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
8
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
9
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
10
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
11
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
12
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
13
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
14
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
15
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
16
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
17
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
18
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
19
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
20
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल

कर्कश आवाजावर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 9:27 PM

मिरवणूक म्हटली की डिजे, ढोल, तासे यांचा गजर केला जातो. परंतु यंदा ५० डेसीबल पेक्षा जास्त आवाज नको व गणपती उत्सव आनंदातून साजरा करावा असे ठरविण्यात आले आहे. मिरवणुकीवर होणारा अनावश्यक खर्च टाळून वाचणारे पैसे समाजातील गरजूंना देण्याचा उपक्रम गणेश उत्सव मंडळांच्या सदस्यांनी सुरू करायला हवा अशा प्रतिक्रीया उमटत आहेत.

ठळक मुद्देशांततेसाठी सर्वांच्या पुढाकाराची गरज : अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदत करा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मिरवणूक म्हटली की डिजे, ढोल, तासे यांचा गजर केला जातो. परंतु यंदा ५० डेसीबल पेक्षा जास्त आवाज नको व गणपती उत्सव आनंदातून साजरा करावा असे ठरविण्यात आले आहे. मिरवणुकीवर होणारा अनावश्यक खर्च टाळून वाचणारे पैसे समाजातील गरजूंना देण्याचा उपक्रम गणेश उत्सव मंडळांच्या सदस्यांनी सुरू करायला हवा अशा प्रतिक्रीया उमटत आहेत.शासनाने डिजेच्या आवाजासाठी मुभा द्यावी, अशी गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांची नेहमीच मागणी असते. मात्र सर्व मंडळांनी सायलेन्स झोन मध्ये कर्कश आवाज करू नये, मंदीर, मस्जीद, रूग्णालय या परिसरात कर्कश आवाज करू नये, मिरणूक काढतांना वाहतुकीचे नियम पाळावे, इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच गणेश मंडळांनी आपल्या मंडळांचा आदर्श समाजासमोर उभा राहील असे काम करावे. गणेशोत्सव साजरा करतांना कर्णकर्कश वाद्य वाजवू नये, ५० डेसीबलपेक्षा अधिक आवाज असू नये यासाठी पोलीस अधिक्षकांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन व गणेश मंडळे एकत्र येऊन शांततेने काम करणार आहेत.विसर्जन करताना पाण्यात मौज-मस्ती करू नयेडिजेवर अश्लील गाणे वाजविणे टाळावे, भक्तीभाव असावा, गुलाल उधळणे बंद करावे, गणेश विसर्जन मिरवणुकीत शक्ती प्रदर्शन नसावे. मिरवणूक काढताना उत्सव मंडळाच्या लोकांनी रस्त्यावरून ये-या करणाऱ्यांचा विचार करून त्यांच्यासाठी जागा सोडावी. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. तसेच विसर्जन करताना पाण्यात मस्ती करणे टाळावे असे ही कळविण्यात आले आहे.१४ संवेदनशील ठिकाणांमध्ये सडक-अर्जुनीगणेशोत्सवात जातीय जंगल महाराष्ट्रात यापूर्वी घडल्या आहेत. राज्यात जातीय दंगल होणाºया १४ संवेदनशील ठिकाणांपैकी सडक-अर्जुनी हे एक ठिकाण असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. परंतु महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेने दंगलीने धगधगणाऱ्या सडक-अर्जुनी या गावाला शांत केले. तरीही या गावाकडे शासनाचे लक्ष असते. एकेकाळी गणेशोत्सवादरम्यान हिंदू-मुस्लिमांची भांडणे येथे व्हायची. परंतु महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने या गावातील लोकांची बैठक घेऊन समन्वय घडवून आणल्याने हे गाव आता शांततेच्या मार्गावर आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८