शहरं
Join us  
Trending Stories
1
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
2
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
3
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
4
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
5
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
6
₹८०००० कोटींची फोडणी, मुकेश अंबानींच्या कंपनीला २ दिवसांत मोठं नुकसान; का झालं असं?
7
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?
8
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
9
Navratri Puja Vidhi 2024 :घटस्थापना आणि घट उत्थापन याचा शास्त्रोक्त विधी जाणून घ्या!
10
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
11
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
13
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
14
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
15
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
17
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
18
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
19
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
20
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश

धान उचल वेळेत न झाल्यास राईस मिलवर करणार गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:20 AM

गोंदिया : मागील खरीप हंगामात पूर्व विदर्भात शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेला लाखो क्विंटल धान अद्यापही ...

गोंदिया : मागील खरीप हंगामात पूर्व विदर्भात शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेला लाखो क्विंटल धान अद्यापही उघड्यावर पडला. परिणामी रब्बीची धान खरेदी संकटात आली आहे. त्यामुळे धानाच्या भरडाईसाठी करार करून धानाची उचल न करणाऱ्या राईस मिलर्सवर आता शासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे. दिलेल्या कालावधीत धानाची उचल न करणाऱ्या राईस मिलर्सवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा अन्न व नागरी पुरवठा विभागाने काढलेल्या आदेशातून दिला आहे.

पूर्व विदर्भात खरीप आणि रब्बी हंगामात हमीभावाने शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी केली जाते. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू हाच या मागील मुख्य उद्देश आहे. मागील खरीप हंगामात पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर या पाचही जिल्ह्यात धानाचे विक्रमी उत्पादन झाले. १ काेटी लाख क्विंटलहून अधिक धान खरेदी करण्यात आली. या दोन्ही विभागाच्या माध्यमातून खरेदी केलेल्या धानाची राईस मिलर्ससह करार करुन भरडाई करून शासनाकडे तांदूळ जमा केला जातो. मात्र मागील खरीप हंगामा दरम्यान भरडाई दर, थकीत वाहतूक भाडे, तांदळातील तूट या मुद्यावरून राईस मिलर्सने धानाची उचल करून भरडाई करण्यास नकार दिला होता. दरम्यान शासन आणि राईस मिलर्स यांच्यात बरेचदा वाटाघाटी झाल्या. मात्र यावर तोडगा काढण्यात चार महिन्यांचा कालावधी गेला. त्यामुळे धानाची उचल होण्यास विलंब झाल्याने ३० लाख क्विंटलहून अधिक धान उघड्यावर पडला होता. आता पावसाळ्याला सुरुवात झाली असून अद्यापही १० लाख क्विंटल धान उघड्यावर आहे. एकट्या गोंदिया जिल्ह्यात दोन लाख क्विंटल उघड्यावर आहे. त्यामुळे या धानाची वेळीच उचल न झाल्यास हा धान खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच आता अन्न व नागरी पुरवठा विभागाने या धानाची उचल करण्यासाठी भरडाईसाठी करार केलेल्या राईस मिलर्सवर दबाव वाढविलेला आहे. धानाची उचल करण्यास दिंरगाई केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा सुध्दा दिला आहे. यामुळे पुन्हा पेच वाढविण्याची शक्यता आहे.

.............

अशी केली जाणार कारवाई

धान उघड्यावर राहून ते सडल्यास ही बाब नैसर्गिक आपत्ती कायद्यांतर्गत गृहीत धरली जाईल. याच अनुषंगाने केंद्र व राज्य शासन आणि जिल्हा नियोजन समितीच्या अधिनियमान्वये कारवाई करण्याची तरतूद आहे. याच अंतर्गत कलम २६,३०,३३,३४, ४१, ५१, ५२, ५३, ५५, ५६ व ६५ च्या तरतुदीनुसार राईस मिलर्स हे कारवाईस पात्र ठरतील.

............

कोट

ज्या राईस मिलर्सने धान भरडाईसाठी शासनासह करार केले आहे. त्यांनी उघड्यावर असलेल्या धानाची उचली करणे सुरू केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ९ लाख क्विंटल उघड्यावर धानाची उचल करण्यात आली आहे. आधी उघड्यावर असलेल्या धानाची पूर्ण उचल केली जाणार असून त्यानंतर गोदामातील धानाची उचल करण्याचा विचार केला जाईल.

- अशोक अग्रवाल, अध्यक्ष राईस मिलर्स असोसिएशन.