शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
2
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
3
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
4
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
5
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
6
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
7
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप
8
कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास
9
सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?
10
IND vs NZ : कॅप्टन Tom Latham ची बॅट तळपली; न्यूझीलंडनं घेतलीये ३०१ धावांची आघाडी
11
दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...
12
काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
13
Maharashtra Assembly 2024: मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे; जिंतूरमध्ये राजकीय गणित कसं?
14
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
15
Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!
16
कोकणात मविआमध्ये बंडखोरी, सावंतवाडीत अर्चना घारे-परब यांनी भरला उमेदवारी अर्ज
17
नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसला नाही; इच्छुक ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार
18
रोहितच्या नावे लाजिरवाणा विक्रम; धोनी-विराटच्या कॅप्टन्सीत असं कधीच नाही घडलं
19
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
20
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे

जिल्हा सीमेवर वाहनचालकांची तपासणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2020 5:00 AM

जिल्ह्यात भाजीपाला, रेशन, फळ व अन्य जीवनावश्यक वस्तू पर जिल्हे व राज्यांतून वाहनांच्या माध्यमातून येत आहेत. यातील बरेच वाहने उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विशेषत: कोरोना हॉटस्पॉट असलेल्या नाशिक आणि नागपूर येथून येत आहेत. या वाहनांतील चालक व वाहकांचा येथील लोकांशी थेट संपर्क येत असून हा प्रकार धोकादायक आहे.

ठळक मुद्देअन्य जिल्ह्यातील वाहनांमुळे धोका : कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तुंची ने-आण करणाºया वाहनांची वर्दळ वाढली आहे. पर जिल्हे व राज्यातून येणाऱ्या या वाहनांच्या चालक व वाहकांचा जिल्ह्यातील लोकांशी प्रत्यक्ष संपर्क येतो. हा प्रकार धोकादायक असून अन्य जिल्ह्यांतून येणाºया वाहनांच्या चालक व वाहकांची जिल्हा सीमेवर तपासणी करावी अशी मागणी कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली असून जिल्हाधिकाºयांना या संदर्भात निवेदन दिले.जिल्ह्यात भाजीपाला, रेशन, फळ व अन्य जीवनावश्यक वस्तू पर जिल्हे व राज्यांतून वाहनांच्या माध्यमातून येत आहेत. यातील बरेच वाहने उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विशेषत: कोरोना हॉटस्पॉट असलेल्या नाशिक आणि नागपूर येथून येत आहेत.या वाहनांतील चालक व वाहकांचा येथील लोकांशी थेट संपर्क येत असून हा प्रकार धोकादायक आहे. जिल्ह्यातील एकमेव रूग्ण आता बरा झाल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. अशात मात्र बाहेरून येणाऱ्या वाहनांच्या चालक व वाहकांमुळे धोका उत्पन्न होण्याची शक्यता टाळता येत नाही. करिता या वाहनांच्या चालक-वाहकांची जिल्हा सीमेवर वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात यावा अशी मागणी कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अमर वऱ्हाडे, जिल्हा युवा काँग्रेसचे अध्यक्ष आलोक मोहंती, गोंदिया जिल्हा एनएसयुआयचे अध्यक्ष हरिष तुळसकर, अर्पीत बंसोड तसेच पदाधिकारी उपस्थित होते.बाहेर अडकलेल्या व्यक्तींना आणा‘लॉकडाऊन’मुळे मोठ्या प्रमाणात मजूर, विद्यार्थी व काही लोक पर जिल्हे व राज्यांत अडकून पडले आहेत. जिल्हा बाहेर आणि विशेषत: परप्रांतात अडकलेल्या मजुरांकडे सध्या एक नवा पैसाही शिल्लक उरलेला नाही. त्यामुळे त्या लोकांपुढे उपासमारीची वेळ आली असून ते पायीच प्रवास करीत आपल्या गावाकडे निघाले आहेत. परिणामी मोठ्या संख्येत मजुरांचे जत्थे दिसत आहेत. त्यांचीही तपासणी होत नसल्याने तेही धोकादायक ठरत आहेत. जिल्ह्यातील अशा लोकांची यादी बनवून द्यावी. जेणेकरुन महाराष्ट्र शासनाचे आदेश येताच त्यांना परत आणण्याकरीता योग्य पाऊल उचलता येतील. विद्यार्थी व लोकांनाही अशाच प्रकारे आणण्याची व्यवस्था करता येईल असेही कॉँग्रेस पदाधिकाºयांची सूचविले. तसेच इतरत्र असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तसेच जिल्ह्यामध्ये असणाºया परप्रांतीय विद्यार्थी आणि मजूरांची मोबाईल क्रमांकासहीत यादी सादर केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या