शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
3
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
4
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
5
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
6
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
7
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
8
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
9
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
10
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
11
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
12
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
13
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
14
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
15
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
16
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
17
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
18
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
19
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

पालकमंत्र्यांनी केली अतिवृष्टीबाधित जरूघाटाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:20 AM

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी महसूल मंडळात १५ जुलै रोजी आलेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले.

शेती व घरांचे नुकसान : लांडगेच्या वारसाला चार लाखांची मदत लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी महसूल मंडळात १५ जुलै रोजी आलेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले. शेती व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या गावातील अनेक कुटूंब अतिवृष्टीने बाधित झाले. याच मंडळात येत असलेल्या चिचोली येथील शेतकरी महेंद्र लांडगे हा शेतातून घरी येत असताना वाहून गेला. पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी अतिवृष्टीने बाधित झालेल्या केशोरी मंडळातील चिचोली, जरूघाटा व प्रतापगड या गावांतील शेतीची तसेच घरांची पाहणी करु न शाळेत व भक्तनिवास येथे आश्रयास असलेल्या कुटुंबांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोत जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स. सभापती अरविंद शिवणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कासीम जामा कुरेशी, माजी जि.प. सभापती उमाकांत ढेंगे, प्रकाश गहाणे, जि.प. सदस्य तेजुकला गहाणे, पं.स. सदस्य अर्चना राऊत, रामलाल मुंगनकर, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, तहसीलदार देवदास बोंबार्डे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, प्रतापगड सरपंच इंदू वालदे यांची उपस्थिती होती. चिचोली येथे पालकमंत्री बडोले यांनी मृत शेतकरी महेंद्र लांडगे यांची पत्नी वत्सला लांडगे हिचे सांत्वन करून नैसर्गिक आपत्ती अनुदानातून ४ लाख रूपयांचा धनादेश दिला. त्यानंतर पालकमंत्र्यांनी जरूघाटा या गावाला भेट देवून पुष्पा लोगडे, मुन्ना तिवसकर व राजू तिवसकर यांच्या क्षतीग्रस्त घरांची पाहणी केली व गावातील चौकात उपस्थित ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या. बाधित कुटुंबांना मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. जरूघाटा येथे ४० घरांचे अंशत: तर एका घराचे पूर्णत: नुकसान झाले असून हे नुकसान पाच लाख ८१ हजारांचे आहे. चिचोली-केशोरी रस्त्याची पाहणी करून अतिवृष्टीमुळे हा रस्ता खराब झाल्यामुळे तातडीने दुरूस्ती करण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या प्रतापगड येथील भक्त निवासात आश्रयास असलेल्या ईश्वर शेंडे, इभाकर झलिपे, मनोहर राऊत,शिनश्वर मडावी, विनायक उईके या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. पालकमंत्र्यांनी यावेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देवून अतिवृष्टीमुळे बाधित शेती व क्षतीग्रस्त घरांचे योग्य प्रकारे सर्वेक्षण करण्यात यावे. कोणताही बाधित शेतकरी तसेच क्षतीग्रस्त घरे नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.