शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

विहिरींवर लोखंडी कठडे बसविलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 9:02 PM

या परिसरातील वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी जंगलाला लागून असलेल्या शेतांमधील विहिरींवर वनविभागाकडून लोखंडी कठडे बसविण्यात येणार होते. मात्र तीन वर्षांचा काळ लोटूनही विहिरींवर कठडे बसविण्यात आले नाही.

ठळक मुद्देवनविभागाचे दुर्लक्ष : शेतकऱ्यानी केली कठड्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : या परिसरातील वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी जंगलाला लागून असलेल्या शेतांमधील विहिरींवर वनविभागाकडून लोखंडी कठडे बसविण्यात येणार होते. मात्र तीन वर्षांचा काळ लोटूनही विहिरींवर कठडे बसविण्यात आले नाही. उलट या कामासाठी काही शेतकºयांकडून प्रती विहीर ३०० ते ४०० रुपयांची उगाही करण्यात आल्याचे बोलले जात आहे.शेंडा, कोयलारी, कोहळीपार, उशिखेडा व प्रधानटोला येथील काही शेतकºयांची शेती जंगलाला लागून आहे. वन्यप्राण्यांची रेलचेल अधिक प्रमाणात असल्याने कोणताही वन्यप्राणी धोक्याने विहिरीत पडू नये म्हणून त्यांच्या संरक्षणासाठी वनविभागाकडून लोखंडी कठडे बसविण्यात येणार होते. या कामासाठी प्रती विहीर ३०० ते ४०० रुपये घेण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे ही योजना फसवी होती की, लालच देणारी असे तर्क-वितर्क लावले जात आहेत.सध्या या परिसरातील शेतकºयांची धानपिकाची रोवणी झाली आहे. त्यामुळे सर्वत्र हिरवेगार रान दिसते. रात्रीच्या वेळेस जंगलातील सांबर, चितळ, रानडुकर व रानगव्या सारखे वन्य प्राणी याच धान पिकावर ताव मारुन शेतकºयांच्या पिकांचे मोठे नुकसान करतात. त्याचबरोबर प्रसंगावधनाने एखादा वन्य प्राणी विहिरीत पडू शकतो हे नाकारता येत नाही. हीच बाब लक्षात घेवून अशा विहिरींवर लोखंडी कठडे लावण्याचे वनविभागाकडून ठरविण्यात आले होते. त्याचे सर्वेक्षण करुन यादी तयार करण्यात आली होती. मात्र तीन वर्षांचा काळ लोटूनही वनविभागाकडून कोणतेच पाऊल उचलण्यात आले नसल्याने ही योजना फसवी होती की लालच देणारी होती हे कळायला मार्ग नाही.वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी तसेच शेतकºयांचे हित लक्षात घेता जंगल परिसरात तारेचे काटेरी कुंपन करणे तसेच विहिरींना लोखंडी कठडे लावणे गरजेचे आहे. यासाठी वनविभागाने त्वरित दखल घेवून जंगल व शेत शिवारातील विहिरींना लोखंडी कठडे बसविण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. सदर प्रकरणाची माहिती घेण्यासाठी सडक-अर्जुनी येथील वनपरिक्षेत्राधिकारी गोवर्धन राठोड यांचेशी मोबाईलवरुन संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.जंगल परिसरातील विहिरींची पाहणी करुन त्याची यादी वनक्षेत्राधिकारी कार्यालयास सादर करण्यात आली होती. परंतु त्याचे काय झाले हे कळले नाही.- मोहतुरेप्र.क्षेत्रसहायक शेंडा.

टॅग्स :forest departmentवनविभागFarmerशेतकरी