शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
6
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
7
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
9
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
10
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
11
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
12
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
13
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
15
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
20
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

सापांना जंगलात सोडणे घातकच

By admin | Published: August 19, 2015 2:01 AM

दरवर्षी नागपंचमीला नागाची पूजा केली जाते. अनेक ठिकाणी नागराजाची मूर्ती बसवून मंदिर उभारले जातात...

नाग शेतकऱ्यांचा मित्र : सापांबाबत नागरिकांचे समज-गैरसमजविजय मानकर  सालेकसादरवर्षी नागपंचमीला नागाची पूजा केली जाते. अनेक ठिकाणी नागराजाची मूर्ती बसवून मंदिर उभारले जातात व नाग देवतेचे पूजन केले जाते. परंतु प्रत्यक्षात साप दिसला की त्याला धोकादायक समजून त्याला ठार केल्याशिवाय मनुष्य श्वास घेत नाही, अशीही काही लोकांची मानसिकता असून ती मोठीच शोकांतिका आहे.साप हा सरपटणारा प्राणी असून जमिनीतील छिद्रांमध्ये त्याचे वास्तव्य असते. स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी जमिनीत लपून असला तरी तो आपल्या भोजनाच्या शोधात सतत इकडे-तिकडे सरपटत असतो. या दरम्यान तो मानव जातीच्या नजरेस पडला की त्याचा मृत्यू ओढवल्याशिवाय राहत नाही. काही सर्पमित्र सापाला पकडून मारणाऱ्यांच्या ताब्यातून सोडवतात व त्याला जंगलात नेवून सोडतात. साप खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मित्र ठरतो. शेतात राहणारे उंदिर, बेडूक आदी जीव-जंतूंना आपला आहार बनवितो. बेडूक हा शेतात पिकांवरील किडींचे भक्षण करतो. त्यामुळे शेतात बेडूक आवश्यक आहे. बेडकांचे प्रमाण वाढले तर त्याचे भक्षण साप करतो. सापांचे प्रमाण वाढले तर त्या परिसरात सापांचे भक्षण करणारे मुंगूस यासारखे प्राणीसुद्धा येतात. अशाप्रकारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या पिकांचे संरक्षण सापांच्या माध्यमातून होत असते. या सर्व बाबी शेतकऱ्यांना माहीत असूनही काही लोक साप दिसला की विशेषकरून नाग सापाला ताबडतोब मारून टाकतात. खरे पाहिले तर कोणताही साप स्वत:हून माणसाला डंख मारत नाही. उलट तो खूप भित्रा प्राणी आहे. मनुष्य दिसला की किंवा स्पंदनाने आभास होताच तो जोराने सरपटत पळ काढतो. जेव्हा सापाला असे वाटते की आपल्यावर हल्ला होत आहे किंवा आपल्या शरिराला इजा पोहचत आहे, तेव्हाच तो आत्मरक्षणासाठी डंख मारतो. परंतु तो माणसाचा शत्रू मुळीच नसून प्रत्येकाने सापाला जीवनदान देण्याचा प्रयत्न करावा.शेत, गाव परिसर व जंगलातील सापांच्या आहारात भिन्नतागाव परिसरात आढळणाऱ्या सापांचे रंग व आहाराचे प्रकार गाव परिसरात मिळणाऱ्या कीटकांवर अवलंबून असतात. तर शेतात राहणारा साप शेतात आढळणाऱ्या बेडूक व इतर कीटकांवर अवलंबून असतो. जंगलात राहणारा साप तेथील रंग व मिळणाऱ्या आहारावर अवलंबून असतो. सर्व प्रकारच्या सापांमध्ये मोठी विविधता असते. त्यामुळे गाव परिसरात राहणाऱ्या सापाचे जंगल परिसरातील हवामानात जगणे कठीण असते. तर जंगलात वावरणारा साप इतर भागात जाऊन जीवन जगणे त्याला सोईस्कर ठरत नसते. त्यामुळे गावात आढणाऱ्या सापाला मारले, तर ती प्रजात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. परंतु जर त्याला जंगलात नेऊन सोडले तर तो तेथे जिवंत राहणार नाही किंवा इतर कीटकांशी लढा देऊ शकणार नाही. त्यामुळे गावातील साप पकडून त्याला जंगलात सोडण्यापेक्षा त्याला त्याच परिसरात मोकळ्यापणाने जाऊ देणे सापांच्या प्रती खरी मित्रता ठरेल. तसेच काही गारूडी लोक सापांना पकडून गावागावात फिरवतात व पोटपाण्याचे साधन बनवितात. परंतु ते साप त्यांच्याजवळ जिवंत राहू शकत नाही.