शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

शिवभोजन वितरण करणाऱ्यांवरच आली उपाशी राहण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 4:20 AM

गोंदिया : कोरोनाच्या कठीण काळात कुणीही उपाशीपोटी राहू नये यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी सुरू केली. यासाठी मोठ्या प्रमाणात ...

गोंदिया : कोरोनाच्या कठीण काळात कुणीही उपाशीपोटी राहू नये यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी सुरू केली. यासाठी मोठ्या प्रमाणात शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले व या केंद्रचालकांना शासनाकडून प्रति थाळी अनुदान ठरवून देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात २४ केंद्रांच्या माध्यमातून गरजूंसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून २६ जानेवारी २०२० पासून आतापर्यंत ४,५८,७१८ नागरिकांनी भोजन देण्यात आले. मात्र या केद्रचालकांना मागील २ महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही. परिणामी गरजूंचे पोट भरणाऱ्यांवरच आता उपाशी राहण्याची पाळी आली असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे, राज्य शासनाच्या या उपक्रमाचा गरजूंना खरेच मोठा आधार झाला व त्यांच्या २ वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला होता. आताही शिवभोजन थाळीच्या माध्यमातून गरजूंना जेवणाची सोय सुरूच आहे. मात्र केंद्रचालकांना अनुदान मिळाल्याने त्यांना ही सर्व व्यवस्था करताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. परिणामी ते आता आर्थिक अडचणीत आले आहेत.

--------------------------------

- जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्र- २४

- आतापर्यंत किती जणांनी लाभ घेतला - ४५८७१८

-------------------------------

प्रति थाळी ५० रुपये अनुदान

केंद्र चालकाने लाभार्थ्याकडून ५ रुपये घेतल्यास त्याला ४५ रुपये तसेच जर १० रुपये घेतले तर ४० रुपये अनुदान दिले जाते. मात्र सध्या नि:शुल्क थाळी वितरण करावे लागत असल्याने एका थाळीवर ५० रुपये अनुदान दिले जात आहे.

---------------------------------

अनुदान रखडले तरीही थाळींचे वितरण तेवढेच

राज्य शासनाने शिवभोजन केंद्रांना एक कोटा ठरवून दिला आहे व त्यानुसार त्यांना थाळींचे वितरण करावयाचे असून त्यावरच अनुदान दिले जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात सध्या गरजूंना नि:शुल्क भोजन वाटपासाठी २४ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांना मागील २ महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही. मात्र तरीही या सर्व केंद्रांकडून त्यांना ठरवून देण्यात आलेल्या थाळींच्या कोट्यानुसार थाळींचे वाटप सुरूच आहे. अनुदान रखडले म्हणून थाळींची संख्या कमी करण्यात आल्याचा प्रकार कुठेच सुरू नाही.

------------------------------

केेंद्रचालक म्हणतात...

शासन आदेशानुसार केंद्रातून गरजूंना नि:शुल्क थाळी दिली जात आहे. त्यात आम्ही अनुदानामुळे काहीच कमी-जास्त केले नाही. गरजूंना आमच्या माध्यमातून काही फायदा होत आहे याचेच समाधान आहे.

केंद्रचालक

--------------------------

अनुदान रखडले असले तरीही शिवभोजन थाळीचे वितरण सुरूच आहे. त्यात आम्ही थाळींची संख्या कमी केलेली नाही. अनुदान मिळणारच आहे, मात्र लोकांना जेवणाची सोय होत आहे हे महत्त्वाचे आहे.

- केंद्रचालक

---------------------------

कोट

जिल्ह्यात २४ शिवभोजन केंद्रे सुरू असून त्यांच्या माध्यमातून गरजूंना थाळींचे वितरण केले जात आहे. या केंद्रांचे २ महिन्यांचे अनुदान द्यायचे आहे. शासनाकडून अनुदान आले असून प्रक्रिया झाल्यावर लगेच त्यांचे अनुदान दिले जाणार आहे.

- डी.एस. वानखेडे

जिल्हा पुरवठा अधिकारी, गोंदिया