शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
2
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
4
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
5
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
6
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
7
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
8
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
9
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
10
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
11
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
12
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
13
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 
14
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
15
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
16
BMW कारमधून आली अन् फ्लॉवर पॉट चोरून घेऊन गेली; महिलेचा कारनामा कॅमेऱ्यात कैद
17
बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या 
18
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
19
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
20
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे

१० गावांतील धान पिकावर कीडरोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 10:17 PM

यंदा पावसाने चांगली साथ दिली असून पिकांची स्थिती चांगली असतानाच त्यावर आता कीडरोगांनी हल्ला केला आहे. यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

ठळक मुद्देआर्थिक नुकसानीचा धोका : कृषी विभागाचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा पावसाने चांगली साथ दिली असून पिकांची स्थिती चांगली असतानाच त्यावर आता कीडरोगांनी हल्ला केला आहे. यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.जिल्ह्यातील १० गावांत धान पिकावर किडरोगाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचा अहवाल कृषी विभागान दिला आहे. अस्मानी व सुल्तानी संकटांनी जिल्ह्यातील शेतकरी भरडला जात आहे. मागील वर्षी पावसाने साथ दिली नाही. यंदा पावसाने साथ दिली तर किडरोगांनी डोकेदुखी वाढविली आहे. परिणामी शेतकºयांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. यंदा धान पिकांवर किडरोगाचा प्रभाव असून तसा अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे.यात, तालुक्यातील रजेगाव, शिवनी, उमरी, सडक-अर्जुनी तालुक्यातील घटेगाव, खोडशिवनी, हेटी (गिरोला), पुरकाबोडी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इसापूर, प्रतापगड व देवरी तालुक्यातील पिंडकेपार या गावांचा समावेश आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून १७ ते २३ सप्टेंबर या कालावधीतील सर्वेक्षण करण्यात आले. त्या अहवालात रजेगाव येथे ०.६० टक्के, शिवनी येथे ०.८० टक्के, उमरी येथे ३.०७ टक्के, खोडकिड्याचा प्रभाव दिसून येत असल्याचे अहवालात नमूद आहे. तर घटेगाव येथे २.२० टक्के धान पिकावर कडा-करपाचा प्रभाव १७ तारखेपर्यंत होता.हेटी (गिरोला) येथे १.३ टक्के, घटेगाव येथे १.१५ टक्के, पुरकाबोडी येथे १.०५ टक्के, इसापूर येथे १.६५ टक्के, प्रतापगड येथे १.४८ टक्के पिकार कडा-करपाचा प्रभाव दिसला आहे. घटेगाव येथे १.५५ टक्के, खोडशिवनी येथे १.०२ टक्के, हेटी येथे १ टक्के, इसापूर येथे १.३ टक्के व पिंडकेपार येथे १.३३ टक्के मानमोडी किडींचा प्रकोप होता. तुडतुडाचा प्रकोप वाढण्याची शक्यता सध्या पाऊस थांबला असून चांगलेच उन्ह तापत आहे. अशा या वातावरणात धान पिकावर तुडतुड्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. कृषी विभागाने आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात तुडतुडा नियंत्रण मोहिम चालविली होती. यामुळे याचा प्रभाव जिल्ह्यात कमी दिसला व त्यामुळेच नुकसानही कमी झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.आता खोडकिडा गादमाशी, कडा-करपाचा धान पिकावर प्रभाव होण्याची शक्यता नाही. त्यांच्या प्रकोपाची वेळ आता निघून गेली आहे. मात्र वातावरण बघता तुडतुड्याचा प्रभाव दिसू शकतो. यामुळे सतर्क राहण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे.-एन.वी.नयनवाडेप्रभारी सहायक, जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस