शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

सामाजिक न्याय मंत्र्याच्या कार्यक्षेत्रात कोमलप्रसाद न्यायापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:17 IST

तालुक्यातील भडंगा येथील शेतकरी कोमलप्रसाद कटरे यांनी शासन दरबारी आपल्या चार मागण्यांना घेऊन २५ जानेवारीपासून येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तीन दिवसाचा कालावधी लोटूनही प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील भडंगा येथील शेतकरी कोमलप्रसाद कटरे यांनी शासन दरबारी आपल्या चार मागण्यांना घेऊन २५ जानेवारीपासून येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तीन दिवसाचा कालावधी लोटूनही प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे सामाजिक न्याय मंत्र्याच्या कार्यक्षेत्रातच कोमलप्रसाद न्यायापासून वंचित असल्याचे चित्र आहे.कोमलप्रसाद कटरे यांनी चार मागण्यांना घेवून उपोषण सुरू केले असून त्यात सन २०१२-१३ मध्ये न्याय देण्यास प्रशासनाने विलंब केल्यामुळे (पुंजण्याची नासधुस झाल्यामुळे) ते चुरणी करु शकले नाही. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यात यावी, राजस्व विभागाच्या चुकीमुळे रेकार्ड दुरुस्तीला पाच वर्षे लावल्यामुळे सतत पाच वर्षे गट न.५५२ ची शेती आरजी १.०२ हे.आर. शेती पडीक राहिल्यामुळे झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी. रेकार्ड दुरुस्तीला चार वर्षे विलंब लावणाऱ्या अधिकाºयावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, पाच वर्षे धावपळ व मानसिक त्रासासाठी आलेला खर्च देण्यात यावा. या चार मागण्यांना घेऊन आमरण उपोषण सुरु केले आहे. कटरे यांनी गेल्या सहा वर्षात पाच आमरण उपोषणे, एकदा पाणी टॉकीवर विरुगिरी केली आहे. आता पुन्हा आमरण उपोषणावर बसून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहे. कटरे यांनी प्रथम शेतात जाण्यासाठी रस्ता देण्याच्या मागणीला घेऊन उपोषण केले होते. शेवटी हतबल झालेल्या प्रशासनाने कोमलप्रसादला न्याय देत रस्ता तयार करून दिला. शेतालगतच्या ०.१४ हे.आर. ह्या विवादित जागेवरुन रस्ता मोकळा झाला. पण या प्रक्रियेसाठी प्रशासनाने चार ते पाच वर्षे लावले. त्यामुळे कोमलप्रसादचे संपूर्ण आयुष्य उध्ववस्त झाले. प्रशासनाचे उंबरठे झिजवित वेळ खर्ची झाला, मानसिक त्रास झाला. त्याची भरपाई मिळाली पाहिजे, आणि ज्या अधिकाºयामुळे हा सर्व प्रकार घडला त्या अधिकाºयावर कारवाई करण्यात यावी, अशी कोमलप्रसादची मागणी आहे.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले