शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
2
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
3
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
4
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
5
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
6
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
7
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप
8
कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास
9
सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?
10
IND vs NZ : कॅप्टन Tom Latham ची बॅट तळपली; न्यूझीलंडनं घेतलीये ३०१ धावांची आघाडी
11
दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...
12
काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
13
Maharashtra Assembly 2024: मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे; जिंतूरमध्ये राजकीय गणित कसं?
14
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
15
Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!
16
कोकणात मविआमध्ये बंडखोरी, सावंतवाडीत अर्चना घारे-परब यांनी भरला उमेदवारी अर्ज
17
नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसला नाही; इच्छुक ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार
18
रोहितच्या नावे लाजिरवाणा विक्रम; धोनी-विराटच्या कॅप्टन्सीत असं कधीच नाही घडलं
19
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
20
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे

हृदयघात, उच्च रक्तदाब व मधूमेहाचे प्रमाण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 5:00 AM

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. घराबाहेर कुणी पडायचे नसून त्यामुळे बाहेर खाण्याचे प्रमाण १०० टक्के बंद झाले. वेळेवर औषध व घरातील शुद्ध आहार लोकांना मिळू लागला व त्यामुळे हृदयरोगाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात या रूग्णांचे प्रमाण कमी दिसण्याची दुसरी बाजू म्हणजे बरेचशे रूग्ण त्रास असूनही बाहेर पडत नाहीत.

ठळक मुद्देआनंदायी वातावरणामुळे बदल : कुटुुंबीयांसोबत योग्य आहार घेण्याचा फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मागील महिनाभरापासून घरातच असलेल्या लोकांना आनंददायी वातावरण व तणावापासून मुक्ती मिळाल्याने या काळात हृदयघात, उच्च रक्तदाब व मधूमेहाचे प्रमाण कमी झाल्याचे वास्तव पुढे आले आहे. कुटुंबीयांसोबत घरातीलच योग्य आहाराचे सेवन होत असल्यामुळे या आजारांत मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे, अशी माहिती हृदयविकार तज्ज्ञ डॉ. प्रमेश गायधने यांनी दिली आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. घराबाहेर कुणी पडायचे नसून त्यामुळे बाहेर खाण्याचे प्रमाण १०० टक्के बंद झाले. वेळेवर औषध व घरातील शुद्ध आहार लोकांना मिळू लागला व त्यामुळे हृदयरोगाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात या रूग्णांचे प्रमाण कमी दिसण्याची दुसरी बाजू म्हणजे बरेचशे रूग्ण त्रास असूनही बाहेर पडत नाहीत.बराचशा रूग्णांचे आनंददायी जीवन (हॅपीनेस इंडेक्स) वाढल्यामुळे ताण कमी झाला आहे. शिवाय, उच्च रक्तदाब व मधूमेहाचे प्रमाण बरेच कमी झाले आहे.‘लॉकडाऊन’च्या काळात अनेक जणांच्या तपासण्या व निदानही कमी झाल्यामुळे रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी दिसून येत आहे. श्वसनाच्या (फुफुस) त्रासामुळे रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. काही रूग्ण रक्ताची गाठ झाल्यामुळे तर काही सरळ इन्फेक्शनमुळे कमजोर हृदय घेऊन दाखल होत आहेत.काळजी घेऊन आपण कोरोनावर मात करू शकतो यासाठी नियमांचे पालन करावे, असे डॉ. प्रमेश गायधने यांनी सांगीतले.हृदयरोगींना कोरोनाचा धोका जास्तहृदयरोगींना कोरोनाचा धोका दुसऱ्यांपेक्षा जास्त असतो. मात्र काळजी व प्रतिबंधात्मक उपायांनी कोरोनाचा टाळला जाऊ शकतो. जुन्या रूग्णांनी हृदयरोगाचा उपचार सुरू ठेवावा व त्यात असलेल्या बदलासाठी डॉक्टरांना फोन लाऊन विचारावे. खूप जास्त त्रास असल्यावरच घर सोडून हॉस्पीटलमध्ये जावे. हृदयरोगींनी औषधींचे ब्रांड बदलू नये याची काळजी घ्यावी. तसे झाल्यास सारख्या मात्रांच्या दुसºया कंपनीची औषधी घेऊ शकतात. फक्त रक्त पातळ करण्याचे औषध बदलता कामा नये. एन्जीओप्लास्टी (स्टेंट) व बायपास झाल्यास रूग्णाने औषध न बदलता सुरू ठेवणे. नियमीत एन्जीओप्लास्टी व एन्जीओग्राफी टाळता येते. छातीत जास्त त्रास्त असल्यास लवकर उपचार करवून घ्यावे. हृदयरोगींना २४ तास ७ दिवस उपचार उपलब्ध आहे.व्यसनापासून दूर रहारूग्णांनी रक्तदाब व मधूमेह रिडींग डॉक्टरांना फोनवर सांगावे. डायलीसीस रूग्णाने किडनीतज्ज्ञांना विचारून डायलीसीस सुरु ठेवावे किंवा पुढे ढकलावे व हृदयरोगींनी उपचार सुरू ठेवावा. हृदयनिकामी झालेल्या रूग्णांनी थोडा व्यायाम सुरू ठेवावा. खाण्यापिण्यात काळजी घ्यावी. सर्व नियमीत शस्त्रक्रिया टाळाव्यात. ‘लॉकडाऊन’मध्ये घरी सिगारेट टाळावेत. सगळ्यांना तंबाखूच्या धुरापासून दूर ठेवावे. दारू टाळावी, दारूची सवय असल्यास मानसोपचार तज्ज्ञांकडून मदत घ्यावी. लहान मुलांच्या हृदयरोगांची शस्त्रक्रिया असल्यास तज्ज्ञांना विचारावे.वाफरीन, असिट्रोम, डॉबीगाट्रान आधी औषधांचा उपचार सुरू असलेल्या रूग्णांनी जूनी आयएनआर रक्त तपासणी डॉक्टरांशी संवाद करून सुरु ठेवणे किंवा बदलावे. कोरोनामध्ये पैशांचा तुटवडा असल्यास हृदय तज्ज्ञांना सांगून स्वस्त औषध करून घेणे, रक्तदाब, मधूमेह यांचा उपचार तसाच सुरू ठेवावा. काही गोष्टीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.-डॉ. प्रमेश गायधनेहृदयविकार रोगतज्ज्ञ गोंदिया.

टॅग्स :Healthआरोग्य