शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

लोकसंख्यावाढीने बेरोजगारीचे राक्षसी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:18 AM

विजय मानकर सालेकसा : गोंदिया जिल्ह्यात मागील दहा वर्षांत ८ टक्क्यांनी लोकसंख्यावाढ झाली आहे. या दरम्यान अनेक कुटुंबांची सदस्य ...

विजय मानकर

सालेकसा : गोंदिया जिल्ह्यात मागील दहा वर्षांत ८ टक्क्यांनी लोकसंख्यावाढ झाली आहे. या दरम्यान अनेक कुटुंबांची सदस्य संख्या दुप्पट ते तिप्पट झाली, परंतु त्यांच्याकडे कृषिभूमी किंवा निवास करण्याची जागा तेवढी राहिली आहे. रोजगाराचे साधनही तेवढेच असून, बेरोजगारीचे संकटही राक्षसाप्रमाणे वाढत चालले आहे. वाढती लोकसंख्या आज सर्वात मोठे चिंतेचे कारण असून, संसाधने मात्र कमी होत चालली आहेत. अशात बेरोजगारीसह इतरही समस्या वाढत आहेत.

सर्वत्र अराजकता मारामारी, चोरी, डाका, दरोडा या सारख्या घटनाही वाढत आहेत. वेळीच प्रभावी उपाययोजना केल्या, तर काही प्रमाणात संभाव्य समस्यांवर नियंत्रण आणता येईल. २०११च्या जनगणनेनुसार गोंदिया जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १३ लाख २२ हजार ५०७ एवढी होती. यात पुरुष ६ लाख ६१ हजार ५५४ आणि महिलांची संख्या ६ लाख ६० हजार ९५३ एवढी होती. ही लोकसंख्या २०२०च्या शेवटपर्यंत १४ लाख ५० हजारांवर पोहोचली आहे. कोरोनाच्या संकटामुळे २०२१चे आकडे तयार झालेले नाही. परिणामी, सध्याच्या स्थितीत जिल्ह्याची नेमकी लोकसंख्या किती हे नेमके सांगता येणार नाही. जिल्ह्यातील ८५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या शेती किंवा शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. एकूण लोकसंख्येतील निम्मे लोक म्हणजे ६ लाख ६० हजारांपेक्षा जास्त लोक निव्वळ मजुरीवर जगत आहेत. या मागील कारण शोधले, तर कृषिभूमी कमी होत चालली व लोकसंख्या वाढत चालली, अशात काही लोकांसाठी कृषिभूमी उरलीच नाही. याला सरळ भाषेत समजून घेणे म्हटल्यास, एका शेतकऱ्याकडे एकूण चार एकर शेती होती. त्याला चार एकर शेती करणे सरासरी परवडणारी असायची, परंतु त्यांची जर चार मुले झाली, तर प्रत्येकाच्या वाट्यात फक्त एकर याप्रमाणे शेतजमीन आली. अशात कोणी भाऊ शेती करायचा, तर कोणी दुसऱ्याला बटई स्वरूपात घ्यायचा आणि स्वत: इतर मजुरीची कामे करून कुटुंबाचा गाडा चालवायचा. पुढे त्यांच्या कुटुंबाची सदस्य संख्या वाढली की, त्यांना मजुरी किंवा इतर मार्ग पत्करून पैसे कमविण्याची वेळ येत गेली.

..............

रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव

गावात रोजगाराअभावी गावातील बेरोजगार लोकांनी शहराकडे धाव घेतली. परिणामी, शहरी लोकसंख्येत वाढ होत आहे. त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचे संकट निर्माण होत गेले. शहरांवर लोकसंख्येचा वाढता भार ही पण एक मोठी समस्या आहे.

............

माल्थसचा सिद्धांत ठरतोय प्रासंगिक

अठराव्या शतकात थॉमस माल्थस यांनी लोकसंख्या वाढीचा सिद्धांत मांडला होता. त्याच्यामते लोकसंख्या ही १,२,४,८ या वेगाने तर संसाधने १,२,३,४ या गतीने वाढतात आणि २५ वर्षांत लोकसंख्या दुप्पट होऊन जाते. मात्र, संसाधन फार कमी वाढतात. वाढत्या लोकसंख्येवर योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.

..........