शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
2
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
3
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
4
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
5
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
6
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
7
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
8
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
9
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
10
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
11
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
12
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
13
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
14
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
15
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
16
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
17
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
18
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
19
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
20
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...

रस्ते अपघातांपेक्षा कोरोनानेच गेले जास्त जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:19 AM

गोंदिया : कोरोनाने थैमान घातल्यामुळे मागील मार्च महिन्यापासून लॉकडाऊन व काही ना काही निर्बंधांमुळे वाहतुकीचे प्रमाण घटत चालले आहे. ...

गोंदिया : कोरोनाने थैमान घातल्यामुळे मागील मार्च महिन्यापासून लॉकडाऊन व काही ना काही निर्बंधांमुळे वाहतुकीचे प्रमाण घटत चालले आहे. परिणामी नागरिकांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे जिल्ह्यातील अपघातांच्या आकडेवारींवरून समजून येत आहे. कोरोनापू‌र्वी अपघातांमुळे नागरिकांनी नाहक जीव जात असल्याची खंत वाटत होती. मात्र मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला व तेव्हापासून लोकांची जीव आणखीच स्वस्त झाला असून कोरोनामुळे वृध्दच काय तरुणांचाही जीव गेला आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात मार्च २०२० पासून आतापर्यंत ६९९ लोकांचा जीव गेला असतानाच सन २०१८ व २०१९ मध्ये ३३४ लोकांचा अपघातांत जीव गेल्याची नोंद आहे. म्हणजेच, अपघाती मृत्यूचे प्रमाण कोरोनाने मागे टाकले असून या दोन्ही प्रकारात मात्र लोकांची नाहक जीव जाताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे, कोरोना आल्यापासून भल्याभल्यांचा जीव गेला असून कोरोनाने लोकांचा जीव आणखीच स्वस्त करून टाकला आहे.

-----------------------------

लॉकडाऊनमध्ये अपघात झाले कमी, पण...

कोरोनामुळे आतापर्यंत दोनदा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यामुळे संचारबंदी लावली जात असल्याने घराबाहेर निघणेही कठीण होते. शिवाय जिल्हाबंदीमुळे लांबचा प्रवास ही बंदच असतो. परिणामी रस्ते अपघातांचे प्रमाण घटले असून या ६ महिन्यांत ८९ अपघातांची नोंद आहे.

- मात्र सन २०२० मध्ये जेथे अपघातांत १४० व सन २०२१ मध्ये आतापर्यंत ५२ लोकांचा जीव गेला असतानाच मार्च २०२० पासून कोरोनामुळे तब्बल ६९९ लोकांचा जीव गेला आहे. म्हणजेच, कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण अपघाती मृत्यूपेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे.

-----------------------------

पायी चालणाऱ्या व्यक्तींनाही धोका

शहरातील कुडवा रिंगरोड येथे सकाळी पायी फिरणाऱ्यांची संख्या चांगलीच असते. विशेष म्हणजे, येथे पायी फिरण्यासाठी गेलेल्या कित्येक नागरिकांना वाहनांनी उडविल्याच्या घटना घडल्या आहेत. आता या ६ महिन्यात ७ नागरिकांना अशाच प्रकारे वाहनांनी उडविल्याचे दिसते. यामुळे पायी चालणाऱ्यांनाही धोका आहेच.

---------------------------

मृतांमध्ये तरुणच अधिक

जिल्ह्यात घडत असलेल्या अपघाती मृत्युमध्ये ३५-५० वयोगटातील व्यक्तींचीच संख्या जास्त असल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेकडून कळले. विशेष म्हणजे, तरुणांना दुचाकी असो की चारचाकी वाहन भरधाव वेगात चालविण्याचे फॅड असते. हेच फॅड अपघातांना व पुढे अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरते.

---------------------------

या ठिकाणी वाहने हळू चालवा

शहरातील बालाघाट रोड टी-पॉईंट व कुडवा नाका हे दोन ठिकाण अपघातप्रवण स्थळ‌ आहेत. येथे आतापर्यंत कित्येकांचा जीव गेला आहे. त्याचप्रकारे जयस्तंभ चौक, जुना उड्डाणपूल हे सुद्धा तेवढेच धोकादायक स्थळ म्हणून शहरात गणले जातात. त्यामुळे येथून वाहन जपून चालविणेच चांगले आहे.

---------------------------------

आपले जीवन अमूल्य आहे

वेळ वाचविण्याच्या नादात भरधाव वेगात वाहन चालविताना अपघात घडल्याने जबर मारला होता. सुदैवाने अपघातातून बचावलो. तेव्हा कळले आपले जीवन अमूल्य असून त्याच्याशी खेळ करणे कधीच परवडणारे नाही.

- देवीदास बिसेन

----------------------------

वाहन अपघातात पायाला जबर मार लागला असून त्यामुळे चालताना आजही त्रास होतो. नशीब बलवत्तर असल्यामुळे त्या अपघातातून जीव वाचला. मात्र पायाचा त्रास जीवनभरासाठी लागला आहे. आपले जीवन सर्वात किमती आहे, त्यामुळे वाहन जपून चालविणेच बरे.

- अशोक वाढई