शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

नवेगावला वेगळी ओळख देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2016 4:18 AM

निसर्गाने भरभरु न दिल्याने गोंदिया जिल्हा वनसमृद्ध व जलसंपन्न आहे. नवेगावबांधचाही परिसर निसर्गसौंदर्याने

गोंदिया : निसर्गाने भरभरु न दिल्याने गोंदिया जिल्हा वनसमृद्ध व जलसंपन्न आहे. नवेगावबांधचाही परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक यावेत आणि स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असून पर्यटनाच्या क्षेत्रात नवेगावबांधची आगळी-वेगळी ओळख निर्माण करू, असा विश्वास पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला. रविवारी १० एप्रिल रोजी नवेगावबांध येथील हॉलीडे होम्स परिसरात जिल्हा वार्षिक योजनेतून क वर्ग पर्यटनस्थळ विकास मूलभूत सुविधा अंतर्गत ५६ लाख रूपयांच्या खर्चाचे तलाव सौंदर्यीकरण व बोटिंग सुविधासंबंधी कामाचे भूमिपूजन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त झालेल्या कार्यक्र मात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार दयाराम कापगते होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, कृषी उत्पन्न बाजार समतिीचे सभापती काशीम जमा कुरेशी, पंचायत समिती सदस्य गुलाब कोरेटी, गोंदिया पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र ढोरे, माजी सभापती प्रकाश गहाणे, विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष अण्णा पाटील डोंगरवार, तहसीलदार बोंबार्डे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, माजी पं.स. सदस्य महादेव बोरकर, उद्यान बचाव संघर्ष समितीचे नवल चांडक, विजय डोये, रामदास बोरकर, केवलदास पुस्तोडे यांची उपस्थिती होती.पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांना पर्यटकांनी भेट द्यावे यासाठी जिल्ह्यात पर्यटन महोत्सव घेण्यात येईल. राज्यात केवळ गोंदियात आढळणाऱ्या दुर्लभ व नामशेष होत चाललेल्या सारस पक्षांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी डिसेंबरमध्ये सारस महोत्सव घेण्यात आला. जिल्ह्यातील अनेक माजी मालगुजारी तलावांवर हिवाळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित व विदेशी पक्षी येत असल्यामुळे हे तलाव पक्षी अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटन सर्कीट म्हणून विकास करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून बडोले म्हणाले, नवेगावबांध परिसरात ८ कोटी ५० लाख रु पये खर्चाचे रिसोर्ट बांधण्यात येईल. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचा १५ कोटी रूपयांचा प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर केला आहे. नवेगावबांध येथे भविष्यात लवकरच बोटिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. या पर्यटनस्थळांच्या विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. नवेगावबांध पर्यटनस्थळासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या देखरेख समितीवर स्थानिकांना सहभागी करून घेण्यात येईल. नवेगावबांध येथे पक्षी अभयारण्य स्थापण्याचा विचार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. कापगते म्हणाले, वन्यजीवप्रेमी व अरण्ययात्री मारूती चितमपल्ली यांच्यामुळेच नवेगावबांधला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला आहे. येथे अनेक पशूपक्षांवर संशोधन होऊ शकते यावर चितमपल्ली यांनी सखोल अभ्यास केला आहे. नवेगावबांध येथील अनेक प्राण्यांच्या प्रजाती नामशेष झाल्या आहे. नवेगावबांध अभयारण्यातील बोदराई, बदबदा व आगेझरी स्थळांचा विकास झाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. गहाणे म्हणाल्या, नवेगावबांध पर्यटन स्थळाच्या विकास कामामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. पर्यटनस्थळाच्या विकासासाठी स्थानिकांची मदत आवश्यक असून मदतीमुळेच भविष्यात पर्यटनस्थळांचा विकास करता येईल, असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविकातून कार्यकारी अभियंता ढोरे म्हणाले, नवेगावबांध पर्यटनस्थळाचा विकास झाल्यास मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येतील. त्यामाध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. ५६ लाख रूपये खर्चुन येथे चौपाटी, बोटिंगकरिता जेटी व धरणाच्या भिंतीचे व परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्र माला नवेगावबांध येथील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. संचालन भेलावे यांनी केले. आभार व्ही.एम.श्रीवास्तव यांनी मानले.(प्रतिनिधी)