शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

धानाची उचल करण्यासाठी १७५ राईस मिलर्सला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:20 AM

गोंदिया : मागील खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची भरडाईसाठी उचल करण्यास वेळकाढूपणा करणाऱ्या जिल्ह्यातील १७५ राईस मिलर्सला जिल्हा मार्केटिंग ...

गोंदिया : मागील खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची भरडाईसाठी उचल करण्यास वेळकाढूपणा करणाऱ्या जिल्ह्यातील १७५ राईस मिलर्सला जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने शनिवारी (दि. २६) नोटीस बजावल्याची माहिती आहे. नोटीस दिल्यानंतरही धानाची उचल न केल्यास पुढे कठोर कारवाई करण्याचा इशारासुद्धा फेडरेशनने दिल्याची माहिती आहे.

भरडाई दर, धानाची गुणवत्ता, प्रति क्विंटल प्रोत्साहन अनुदान, थकीत वाहतूक भाडे या सर्व विषयांना घेऊन राईस मिलर्सने शासकीय धानाची भरडाई न करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, तोडगा काढण्यात शासनाला तब्बल चार महिन्यांचा कालावधी लागला. परिणामी हा गुंता वाढला आणि रब्बीतील धान खरेदीची वेळ आली तरी खरीप हंगामातील धानाची उचल झाली नव्हती. त्यामुळेच रब्बीचे खरेदी केेलेले धान ठेवण्यासाठी जिल्ह्यातील शाळा अधिग्रहीत करण्याची वेळ प्रशासनावर आली. अद्यापही जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाचा लाखो क्विंटल धान उघड्यावर पडला आहे. अशात आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वेळीच या धानाची उचल न केल्यास पावसामुळे हा धान खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता शासन आणि प्रशासनाने यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. खरिपातील धानाची भरडाई करण्यासाठी शासनासह करार केलेल्या २७५ राईस मिलर्सपैकी १७५ राईस मिलर्सने भरडाईसाठी धानाची उचल केली नव्हती. त्यामुळे या राईस मिलर्सला जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने शनिवारी नोटीस बजावली आहे. यानंतरही धानाची उचल करण्यास दिरंगाई केल्यास पुढे कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राईस मिलर्समध्ये देखील रोषाचे वातावरण आहे.

..................

ऑनलाईन नोंदणीसाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ

रब्बी हंगामातील धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना यंदा शासनाने सात-बारा ऑनलाईन नोंदणी करण्याची अट घातली होती. पहिल्यांदा याची मुदत ३० एप्रिल होती, त्यानंतर ती वाढवून ३० मे करण्यात आली. मात्र, यानंतरही बरेच शेतकरी धानाची विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यापासून वंचित होते. त्यामुळे पुन्हा एकदा आता ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

..............

रब्बीतील धान खरेदीला १५ दिवसांच्या मुदतवाढीचे संकेत

रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी यंदा गोदामांची समस्या निर्माण झाल्याने खरेदी संथगतीने सुरू आहे. त्यामुळे अद्यापही २० लाख क्विंटलहून अधिक धान शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. हीच बाब लक्षात घेता रब्बी हंगामातील शासकीय धान खरेदीला १५ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळण्याचे संकेत पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले आहे. जिल्हा प्रशासनानेसुद्धा या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.

...................