शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

जि.प.सदस्यांचा अधिकारासाठी आता न्यायालयीन लढा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2022 5:00 AM

१९ जानेवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यानंतर पंधरा दिवसात जि. प. अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र याला आता तीन महिन्याचा कालावधी लोटूनही या निवडणुका घेण्यात आल्या नाही. त्यामुळे निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या ५३ आणि पंचायत समितीच्या १०८ सदस्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित राहावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तीन महिन्याचा कालावधी लोटला मात्र अध्यक्ष आणि सभापती पदाची निवडणूक अद्यापही घेण्यात आली नाही. त्यामुळे निवडून आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत सदस्यांच्या अधिकारांचे हनन होत आहे. शासनाने यावर अद्यापही तोडगा न काढल्याने निवडून आलेल्या २६ जि. प. सदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ४ एप्रिलला याचिका दाखल केली आहे. गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आधीच कोरोनामुळे दीड वर्ष लांबणीवर गेली होती. त्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात निवडणुका पार पडल्या. १९ जानेवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यानंतर पंधरा दिवसात जि. प. अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र याला आता तीन महिन्याचा कालावधी लोटूनही या निवडणुका घेण्यात आल्या नाही. त्यामुळे निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या ५३ आणि पंचायत समितीच्या १०८ सदस्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित राहावे लागत आहे. आठ पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत मागील दोन वर्षांपासून प्रशासकराज सुरू असून ग्रामविकास विकासाला सुद्धा ब्रेक लागला आहे. कुठलेही कारण नसताना ग्रामविकास विभागाकडून या निवडणुका लांबणीवर टाकल्या जात आहे. या सर्व प्रकाराला कंटाळून भाजपच्या २६ जि. प. सदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात राज्य सरकार विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यामुळे सदस्यांनी आता आपल्या अधिकारांसाठी न्यायालयीन लढा सुरू केल्याचे चित्र आहे. 

 हा तर लोकशाहीचा अवमान - निवडून आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवणे म्हणजे हा लोकशाहीचा अवमान आहे. राज्य सरकारच्या अशा धोरणामुळे लोकशाहीचा ढाचा ढासळेल अशी संतप्त प्रतिक्रिया जि. प. सदस्य संजय टेंभरे, पंकज रहांगडाले, माधुरी रहांगडाले, लायकराम भेंडारकर, डॉ. लक्ष्मण भगत यांनी दिली. आता लक्ष याचिकेच्या सुनावणीकडे - जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीचा तिढा अद्यापही सुटला नसल्याने जिल्हा परिषद सदस्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आता पुढील आठवड्यात सुनावणी होणार असल्याने त्याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

काय आहे अडचणस्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे ओबीसी जागा जनरल करून जिल्हा परिषदेची निवडणूक घेण्यात आली. मात्र आरक्षण रद्द होण्यापूर्वी जि. प. अध्यक्ष आणि पं. स. सभापतीपदाचे आरक्षण जाहीर झाले होते. त्यामुळे जुन्याच आरक्षणानुसार निवडणूक घ्यायची की, नव्याने आरक्षण काढायचे असा पेच जिल्हा निवडणूक विभागापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनी ग्रामविकास विभागाकडे यावर मार्गदर्शन मागविले आहे. पण ग्रामविकास विभागाने यावर मागील तीन महिन्यापासून कुठलेच उत्तर दिले नाही. त्यामुळे निवडणुकीचा पेच कायम आहे.  

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद