शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

बायपास मार्गासाठी एक कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 10:12 PM

आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे प्रसिद्ध नागरा शिव मंदिरापर्यंत बायपास मार्गाच्या बांधकामासाठी भूमी अधिग्रहणाकरिता एक कोटींचा निधी सा.बां. विभागाला (रोहयो) मंजूर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : तीर्थक्षेत्र नागरा मंदिरापर्यंत होणार रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे प्रसिद्ध नागरा शिव मंदिरापर्यंत बायपास मार्गाच्या बांधकामासाठी भूमी अधिग्रहणाकरिता एक कोटींचा निधी सा.बां. विभागाला (रोहयो) मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून गोंदिया-बालाघाट राज्यमार्ग ते सरळ शिव मंदिर नागरापर्यंत रूंद बायपास मार्गासाठी जमीन मिळवून घेण्यात येईल. या रस्त्याचे बांधकाम झाल्यावर भाविकांना नागरा शिवमंदिरात ये-जा करणे सोयीचे होईल.सध्या मुख्य मार्गाने नागरा शिव मंदिरात पोहोचण्यासाठी गावाच्या मधातून जावे लागते. या रस्त्याची रूंदी कमी आहे. तसेच अनेकांनी घरांच्या ओट्यांचे बांधकाम केल्याने रस्ता आणखी अरूंद झाला आहे. त्यामुळे इतर दिवशी अडचण होत नसली तरी शिवरात्री व इतर सणांप्रसंगी होणाऱ्या गर्दीमुळे भाविकांना शिव मंदिर-भैरव मंदिरात पोहोचण्यासाठी मोठाच त्रास होतो. ही समस्या बायपास रस्त्यामुळे सुटणार आहे.काही दिवसांपूर्वी आ. अग्रवाल यांच्या पुढाकाराने नागरा शिव मंदिर परिसराच्या विकासासाठी महाराष्टÑ राज्य तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत दोन कोटींचा निधी शासनाने मंजूर केला होता. त्यातून भक्त निवास, संरक्षण भिंत, शौचालय, सिमेंट रस्ते, पथदिवे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडून निधी मिळवून घेण्याकरिता तीर्थक्षेत्राला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळणे आवश्यक होते. त्यासाठी आ. अग्रवाल यांनी पाठपुरावा करून ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून दिला व परिसर विकासासाठी दोन कोटींच्या निधीलाही मंजुरी मिळवून दिली.नागरा येथील शिवमंदिर प्राचीन असून गोंदिया, भंडारा व बालाघाटसह मध्य भारतातील हजारो भाविकांसाठी आस्था व श्रद्धेचे केंद्र आहे. त्यामुळे येथे येणाºया भाविकांना सुविधा देणे, नागरा ग्राम व मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी आ. अग्रवाल यांनी प्रयत्न केले आहे. त्यामुळे येथे तलावाचे सौंदर्यीकरण, विद्युतीकरण व तलावाच्या पाळीवर पेविंग ब्लॉक पथचे बांधकाम महाराष्टÑ राज्य पर्यटन विकास महामंडळाद्वारे करण्यात आले. नागराच्या शिवमंदिरात पोहोचण्यासाठी सध्याच्या मार्गाचे डांबरीकरण केले जात आहे. तर गोंदिया-बालाघाट मार्ग ते सरळ बायपास मार्गाच्या बांधकामासाठी मार्ग प्रशस्त झाला आहे. त्यामुळे दरवर्षी शिवरात्री पर्वावर प्रवाशांना होणारी ट्रॉफीक जामची समस्या आता होणार नाही.विशेष म्हणजे नागरा शिव मंदिराचा इतिहास ८०० वर्षांपेक्षाही प्राचीन आहे. तसेच परिसरात भारतीय पुरातत्व विभागाद्वारे केलेल्या खोदकामात प्राचीन अनेक मानवनिर्मित अवशेषसुद्धा प्राप्त झाले आहेत. त्यामुळे नागराधामचा विकास व्हावा अशी मागणी आहे.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल