शहरं
Join us  
Trending Stories
1
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
2
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

वाहन अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:07 AM

शहरातील राज्य मार्गावरील खड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. या मार्गावर पडलेले खड्डे वाहन चालक

तीन गंभीर : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात लोकमत न्यूज नेटवर्क आमगाव : शहरातील राज्य मार्गावरील खड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. या मार्गावर पडलेले खड्डे वाहन चालक व पायी मार्गक्रमण करणाऱ्यांसाठी मृत्यूला आमंत्रण देत आहेत. आमगाव शहरातील याच राज्य मार्गावर बुधवारच्या पहाटे किरणापूरकडून रायपूरकडे जाणाऱ्या वाहनाला अपघात झाला. यात एकाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी झाले. आमगाव शहरातील मुख्य राज्य मार्गावर नियोजन अभावी रस्ते खड्यांमध्ये रुपांतरीत झाले आहे. त्यामुळे रस्त्यांवरील मार्गक्रम धोक्याचे ठरले आहे. १८ जुलैला मध्यरात्री किरणापूर येथील कावरे कुटुंबिय रायपूरकडे टाटा इनोव्हा क्र.सीजी ०४ डीए ०३०९ या वाहनाने रायपूरकडे जाताना आमगाव व येथील मानकर गुरुजी चौकात खड्यांमधून वाहन मार्गक्रम करताना वाहन असंतुलीत झाले. परिणामी हे वाहन रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या रस्ता दुभाजकाला धडकले. यात वाहनाचे समोरील भागाचा चंदामेंदा झाला. या अपघातात वाहनातील भोजराज नुतनलाल कावरे (४०) यांचा जागीच मृत्यू झाला. वाहनातील कृष्णा शोभेलाल कावरे (१९), आशिष शोभेलाल कावरे (२०), वासूदेव शोभेलाल कावरे (१७) हे तिघे गंभीर जखमी झाले. अपघातातील जखमी व्यक्तींना ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. पोलीस विभागाने अपघातातील वाहन चालक संजू राजकुमार शाहू (४०) रा. रायपूर (छ.ग.) यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आमगाव येथील मुख्य मार्गावर पडलेल्या रस्त्यांवरील खड्यांमुळे अपघाताची होत असलेली घटना यात सार्वजनिक बांधकाम विभागाला घटनेच्या दोषारोपात घेण्यात यावे, अशी मागणी होत आहे.