शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी उरले केवळ १२ दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 6:15 PM

Gondia : १५ जुलैपर्यंत नोंदणी करून या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेण्याची संधी

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ केवळ एक रुपयात मिळणार असून, १५ जुलैपर्यंत नोंदणी करून या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. यासाठी आता केवळ १२ दिवसांचा कालावधी शिल्लक असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी महेंद्र दिहारे यांनी केले आहे. तालुक्यात बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर केली जाते. त्यातही पावसाचे प्रमाण, कीडरोग इतर आपत्तीमुळे शेतकऱ्याचे नुकसान होते. प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिल्यास त्यांना नुकसान भरपाई देता यावी, यासाठी योजना सुरू केली आहे.

असे आहे योजनेचे स्वरुप■ खरीप व रब्बी हंगामात जोखमीमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ घेता येतो. प्रतिकूल हवामानामुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकाच्या हवामानामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे होणारे नुकसान, पीक पेरणी ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, क्षेत्र जलमय होणे, दुष्काळ पावसातील खंड, कीड व रोग इत्यादीमुळे उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणामुळे पिकाचे होणारे काढणीपश्चात नुकसान.

...या आहेत अटी शर्ती■ शेतकऱ्याचा सातबारा त्याच्या नावावर असावा, आपत्तीमध्ये नुकसान झाल्यावर सर्वेक्षण केले जाईल. सक्षम अधिकाऱ्याचे तसे प्रमाणपत्र सादर केल्यावर नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. शेतकऱ्याने विविध पद्धतीने पीक विमा काढलेला असावा. नुकसान पश्चात क्राप इन्शुरन्स या अॅपवर नुकसानीबाबत तक्रार करावी. त्यानंतर विमा प्रतिनिधी पाहणी करून पुढील कार्यवाही करतील. बैंक, सामूहिक सेवा केंद्र, विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या मार्फत नोंदणी करता येईल. 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र