शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, ८ वाहने जळून खाक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
6
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
7
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
8
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

सिंचन प्रकल्पात फक्त ३१ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 9:53 PM

ऐनवेळी पावसाने दगा दिल्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. परतीचा पाऊस न बरसल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना पुन्हा एकदा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ३१.७१ टक्के पाणीसाठा आहे.

ठळक मुद्देमामा तलावांची स्थिती गंभीर : इटियाडोह, पुजारीटोला व सिरपूर प्रकल्पातून पाणी सोडले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ऐनवेळी पावसाने दगा दिल्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. परतीचा पाऊस न बरसल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना पुन्हा एकदा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ३१.७१ टक्के पाणीसाठा आहे.यामुळे येणारा काळ कठीणच म्हणावा लागणार असून आजपासूनच पाण्याची बचत करावी लागणार आहे. यंदा जिल्ह्यात सप्टेंंबर महिन्यापर्यंत ८२ टक्के पाऊस झाला. चांगला पाऊस बरसला असे म्हटले जात असताना परतीच्या पावसाने दगा दिल्याने सिंचन प्रकल्प शंभर टक्के भरली नाहीत. याचा प्रभाव धान पिकावरही पडला असून पावसाअभावी जिल्ह्यातील काही भागांत धान पिकाचे नुकसानही झाल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून इटियाडोह, पुजारीटोला व सिरपूर प्रकल्पांतून पाणी सोडले जात आहे. परिणामी इटियाडोह प्रकल्पात आता ४१ टक्के व सिरपूर प्रकल्पात फक्त २७ टक्के पाणीासाठा आहे.मागील वर्षी जिल्ह्यात फक्त ५८ टक्के पाऊस पडला होता. परिणामी जिल्ह्यात पाणी टंचाईची झळ दिसून आली होती. आता यंदाची पाणीसाठयाची आकडेवारी बघून शासनाची चिंता वाढली असल्याचे दिसते. यामुळेच राज्य शासनाने जिल्ह्यातील देवरी, सालेकसा व अर्जुनी-मोरगाव तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषीत केले आहे. पाटबंधारे विभागानुसार, मध्यम प्रकल्पातील ९ प्रकल्पांत २८.५९ टक्के, लघु प्रकल्पांतर्गत २२ प्रकल्पांत ३३.०७ तर ३८ मालगुजारी तलावांत ३९.९७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.चिरचारबांध तलाव आटलापाणीसाठा घटत चालला असतानाच आमगाव तालुक्यातील चिरचाडबांध तलाव मात्र आताच कोरडे पडले असून तलावात पाणीसाठाच नाही. मामा तलावांतर्गत कोसबीबकी तलावात १.३५ टक्के, ककोडी ९.१८ टक्के, तेढा ३.३२ टक्के पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्पांतर्गत चोरखमारा प्रकल्पात ८.१६ टक्के तर लघु प्रकल्पांतर्गत भदभद्या प्रकल्पात ६.२६ टक्के, गुमडोह ४.२२, रिसाळा ३.८२, सोनेगाव ८.२३, सडेपार ७.०६, सेरपार ५.७० टक्के पाणीसाठा आहे. या तलावांची स्थिती बघता येत्या डिसेंबर महिन्यापूर्वीच हे तलाव कोरडे पडू शकतात असे दिसून येत आहे. याशिवाय, बोदलकसा तलावात १७.९१ टक्के, चूलबंद १९.३३, खैरबंदा २१.७९, रेंगेपार २३.५९, आक्टीटोला १६.५३, पांगडी २५.८५, रेहाडी १०.२५, राजोली १३.०१, कोकणा १९.४८, खाडीपार २१.७०, नांदलपार १७, भानपूर १०.६६ तर बोपाबोडी तलावात १५.०६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पwater shortageपाणीटंचाई