शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
2
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
3
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
4
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
5
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
6
"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला!
7
Zerodha नं गुंतवणूकदारांना दिली आनंदाची बातमी, ब्रोकरेज चार्जवर केली मोठी घोषणा
8
“गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला १५०० रुपये मिळाले असते का?”: शहाजीबापू पाटील
9
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? काही क्षणात तुम्हाला करतात कंगाल!
10
महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु
11
दुधाचा चहा ठरू शकतो 'या' जीवघेण्या आजारांसाठी कारणीभूत?; ICMR चा धक्कादायक रिपोर्ट
12
धक्कादायक! शाळेच्या बसने अचानक घेतला पेट; 25 विद्यार्थी-शिक्षकांचा होरपळून मृत्यू
13
"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला", मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा 
14
Loan घेण्यासाठी महत्त्वाचा असतो CIBIL Score आणि Credit Score; तुम्हाला दोघांतला फरक माहितीये का?
15
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले
16
मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला ५० वर्षांहून अधिक काळ अबाधित असणारा गावसकरांचा विक्रम
17
शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?
18
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
19
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
20
"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा

धरती मातेच्या रक्षणासाठी एकच संकल्प ‘वृक्षारोपण’

By admin | Published: June 26, 2017 12:16 AM

देश व राज्यातील वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उद्योगक्रांतीमुळे आमचे जीवन कठीण झाले आहे.

अनील सोले : ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशन व वनविभागाने काढली वृक्षदिंडी लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : देश व राज्यातील वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उद्योगक्रांतीमुळे आमचे जीवन कठीण झाले आहे. तेथेच मोठ्या संख्येत झाडांच्या घटमुळे पर्यावरण संतुलन ढासळत चालले आहे. आम्हाला मानवी जीवन सुरक्षीत ठेवायचे असेल तर धरती मातेच्या रक्षणासाठी वृक्षारोपण हाच संकल्प घेतला पाहिजे असे प्रतिपादन ग्रीन अर्थ आॅर्गनायजेशनचे अध्यक्ष प्रा.आमदार अनील सोले यांनी केले. शनिवारी (दि.२४) ग्रीन अर्थ आॅर्गनायजेशन व वनविभागाच्या संयुक्तवतीने येथील जयस्तंभ चौकात आयोजीत वृक्षदिंडी यात्रेच्या वनमहोत्सव कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी आमदार डॉ.परिणय फुके, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, ग्रीन अर्थ आॅर्गनायजेशनचे सचिव प्रशांत कांबडे, डीएफओ एस.युवराज, सहा. उपवनसंरक्षक यु.टी.बिसेन, सहायक वन संरक्षक एन.एस.शेंडे, आरएफओ जायस्वाल, नेतराम कटरे, भाऊराव उके, संतोष चव्हाण, संजय कुलकर्णी, न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, शहर अध्यक्ष सुनील केलनका, नगरसेवक भरत क्षत्रीय उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार सोले यांनी, महाराष्ट्र राज्याला हरीत महाराष्ट्र बनविण्यासाठी मागील वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संकल्प घेऊन दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प घेतला होता. यांतर्गत एकाच दिवसात राज्यात दोन कोटी ८२ लाख वृक्ष लावून अभियानाची लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करविली होती. यंदा ग्रीन अर्थ आॅर्गनायजेशनच्या माध्यमातून नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा व चंद्रपूरमध्ये वृक्ष लागवडीचा संकल्प घेऊन २२ ते ३० जून पर्यंत वृक्ष दिंडी काढून लोकांना प्रोत्साहीत केले जात असल्याचे सांगीतले. तसेच १ ते ७ जुलै दरम्यान वनमहोत्सव २०१७ साजरा केला जात असून राज्य सरकारने चार कोटी तर गोंदिया जिल्ह्याने साडे बारा लाख वृक्ष लागवडीचा संकल्प घेतल्याचे सांगीतले.