शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अतिवृष्टीने झाले १० हजारवर हेक्टरमधील पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 15:14 IST

२५ हजार शेतकरी बाधित : गोंदिया तालुक्यात सर्वाधिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यात गेल्या महिन्यात ८ ते १० सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे कृषी विभागांतर्गत पंचनामे करण्यात आले. त्यात १० हजारवर हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून, २५ हजार शेतकरी बाधित झाले आहेत. हा नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून शासनाला पाठविला जाणार असून, त्यानंतर नुकसानभरपाई जाहीर होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात २ लाख १० हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. यात सर्वाधिक १ लाख ९६ हजार हेक्टर क्षेत्र धानाचे आहे. धानाची रोवणी झाल्यानंतर पीक वाढण्याच्या स्थितीत असताना ८ ते १० सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली होती. अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचा सर्वाधिक फटका गोंदिया, आमगाव, देवरी, सालेकसा, सडक अर्जुनी या तालुक्यांना बसला होता. 

नदी काठचे हजारो हेक्टरमधील पिके पाण्याखाली होती. त्यामुळे धानासह भाजीपाला व इतर पिकांचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश शासन आणि प्रशासनाने कृषी विभागाला दिले होते. कृषी विभागाच्या यंत्रणेने जिल्ह्यातील आठही तालुक्यातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले. तसेच एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याची दक्षता घेतली. त्यात अतिवृष्टीमुळे १० हजारवर हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले २५ हजारवर शेतकरी बाधित झाल्याचे पुढे आले. कृषी विभागातर्फे पंचनाम्याचा अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून, लवकरच हा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे. 

शेतकऱ्यांच्या नजरा नुकसानभरपाईकडे अतिवृष्टीमुळे धानासह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांना केलेला लागवड खर्चसुद्धा भरून निघण्याची शक्यता कमी असल्याने चिंता सतावत आहे. त्यामुळे नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल सादर केल्यानंतर शासन नेमकी किती नुकसानभरपाई जाहीर करते, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

सहा तालुक्यांना बसला सर्वाधिक फटकागेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा सर्वाधिक फटका हा गोंदिया, सालेकसा, आमगाव, तिरोडा, सडक अर्जुनी, देवरी या तालुक्यांतील शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी साचल्याने धानाची रोवणी वाहून गेली तर काही शेतकऱ्यांचे धान सडल्याने त्यांना खरीप हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय बाधित शेतकरी व झालेले नुकसान तालुका                     बाधित शेतकरी                              बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये गोंदिया                            १३७१५                                           ६०३५ अर्जुनी मोरगाव                   ३९                                               ५.९० देवरी                               ११५१                                            ४६४. १६गोरेगाव                            ४३२                                              १४७. १६                 तिरोडा                             ४१९१                                            १८१. ८६आमगाव                           ३८७८                                          १२५९.५७ सडक अर्जुनी                    १११३                                             २४४.४८

टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रgondiya-acगोंदिया