शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

तलावाच्या नावे ‘मृत्यूचा खड्डा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2017 12:15 AM

तिरोडा तालुक्यात राज्यातील सर्वात मोठा विद्युत पॉवर प्लांट आल्यानंतर तिरोडा तालुकावासीयांनी आनंद व्यक्त केला.

चुरडी गावालगत तयार : पिचिंग व चढण्या-उतरण्याची व्यवस्था नाही लोकमत न्यूज नेटवर्क काचेवानी : तिरोडा तालुक्यात राज्यातील सर्वात मोठा विद्युत पॉवर प्लांट आल्यानंतर तिरोडा तालुकावासीयांनी आनंद व्यक्त केला. नागरिकांनी खुल्या मनाने प्लांटला सहकार्य केले. कोणतीही अडचण निर्माण होवू दिली नाही. मात्र आता प्लांटचे संचालक व तेथील अधिकाऱ्यांच्या अयोग्य धोरण व कार्यामुळे तिरोडावासी संतापले आहेत. चुरडी गावालगतच गाव तलावाच्या नावे तयार करण्यात आलेल्या ‘मृत्यूच्या खड्ड्या’मुळे नागरिक चांगलाच रोष व्यक्त करीत आहेत. तिरोडा शहरालगत असलेल्या चुरडी गावाजवळ अदानी पॉवर फाऊंडेशनकडून १० ते १५ फूट खोलीचा गाव तलाव तयार करण्यात आला. हा तलाव नसून मृत्यूचा खड्डा असल्याचे नागरिक बोलतात. तलाव कोणत्या उद्देशाने तयार करण्यात आला, हे समजण्यासारखे दिसत नाही. जनावरे व गावातील नागरिकांसाठी अनुपयोगी असल्याचे समजते. मात्र त्यामुळे जीव धोक्यात येवून कधीही जीवितहानी घडू शकते. पावसाळा सुरू झाला असून तलाव म्हणून भयंकर स्वरूपात खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. या तळ्याला पिचिंग करण्यात आले नाही. चढण्या-उतरण्यासाठी कोणतेही साधन ठेवण्यात आले नाही. जनावरे, माणसे, मुले आदी तळ्यात गेले तर बाहेर निघणार कसे? त्यांचा जीव वाचेल कसा? याबाबत कोणतीही काळजी घेण्यात आली नाही. या भागातील मृदा ही कन्हारी (चिकन) असल्याने त्यात घसरून फसण्याचेच प्रमाण अधिक आहे. एकदा तळ्यात गेलेला बालक, तरूण, वृद्ध किंवा जनावर परतणार नाही, त्याचे केवळ मृतदेहच बाहेर येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्या ठिकाणी गाव तलाव तयार करण्यात आला, त्याला लागूनच १५ ते २० मीटर अंतरावर चुरडीच्या गरीब नागरिकांची घरे आहेत. या घरातील लहान मुलांसह जनावरांचे जीव चोवीस तास धोक्यात राहणार आहे. ग्रामपंचायत चुरडी व तालुका प्रशासनाने या बांधकामाची मंजुरी दिली कशी, ही आश्चर्याची बाब आहे. पावसाळ्याचा जोरदार पाऊस बरसण्यापूर्वी तयार करण्यात आलेल्या या मृत्यूच्या खड्ड्याला (तलाव) चारही बाजूंनी सुरक्षा भिंत तयार करण्यात यावी. अन्यथा जनावरांसह माणसांची जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर कसलीही दुर्घटना घडली तर याची किंमत अदानी पॉवरला चुकविणे सहज होणार नाही, अशा इशारासुद्धा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. १२ एकर शेती बुडीत पॉवर प्लांट तयार होईपर्यंत नागरिकांना व शेतकऱ्यांना कसातरी दिलासा देण्यात आला. काम पूर्णत्वाकडे असताना लोकप्रतिनिधी, नागरिक व अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याचा विसर कंपनीला पडला आहे. चुरडी येथील उदाराम जांभूळकर यांची १२ एकर शेती असून अदानी पॉवरने वरच्या बाजूला नवीन पाण्याचा तलाव तयार केला. त्यामुळे या तलावाचे पाणी सतत शेतात झिरपत (सिपेज) असते. पिकांना सतत पाणी असल्याने उत्पन्नात घट येते. तसेच धान कापणीला आल्यास पाणी भरले असल्याने कापण्याची समस्या निर्माण होते. यावर्षी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने जांभूळकर कुटुंबाला माजी आ. दिलीप बन्सोड यांनी ३० हजार रूपयांची आर्थिक भरपाई मिळवून दिली आहे. विकासाच्या नावे पिळवणूक अदानी फाऊंडेशनने दत्तक घेतलेल्या गावात तसेच पुनर्वसन केलेल्या गावात शासनासोबत केलेल्या करारनाम्यात विविध सुविधा आहेत. त्या सुविधा देण्यास अदानी फाऊंडेशन अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विकास करण्याचे केवळ ढिंढोरे पिटले जात असून नागरिकांना सुविधा कमी तर सुविधेच्या नावावर अदानीचा पैसा हडप केला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. अधिकाऱ्यांना खूश ठेवून नागरिकांची मात्र पिळवणूक केली जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.