शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
2
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
3
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
4
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
5
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
6
"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला!
7
Zerodha नं गुंतवणूकदारांना दिली आनंदाची बातमी, ब्रोकरेज चार्जवर केली मोठी घोषणा
8
“गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला १५०० रुपये मिळाले असते का?”: शहाजीबापू पाटील
9
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? काही क्षणात तुम्हाला करतात कंगाल!
10
महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु
11
दुधाचा चहा ठरू शकतो 'या' जीवघेण्या आजारांसाठी कारणीभूत?; ICMR चा धक्कादायक रिपोर्ट
12
धक्कादायक! शाळेच्या बसने अचानक घेतला पेट; 25 विद्यार्थी-शिक्षकांचा होरपळून मृत्यू
13
"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला", मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा 
14
Loan घेण्यासाठी महत्त्वाचा असतो CIBIL Score आणि Credit Score; तुम्हाला दोघांतला फरक माहितीये का?
15
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले
16
मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला ५० वर्षांहून अधिक काळ अबाधित असणारा गावसकरांचा विक्रम
17
शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?
18
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
19
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
20
"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा

बिरसी येथील आंदोलनाची प्रधानमंत्री कार्यालयाकडून दखल ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 4:29 AM

गोंदिया : मागील दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या तालुक्यातील ग्राम बिरसी येथील सुरक्षा रक्षकांच्या आंदोलनाची दखल अखेर प्रधानमंत्री कार्यालयाकडून ...

गोंदिया : मागील दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या तालुक्यातील ग्राम बिरसी येथील सुरक्षा रक्षकांच्या आंदोलनाची दखल अखेर प्रधानमंत्री कार्यालयाकडून घेण्यात आली आहे. प्रधानमंत्री कार्यालयाकडून संघटनेला पत्र पाठविण्यात आले आहे. तसेच या सुरक्षा रक्षकांच्या मागण्या तातडीने सोडविण्यासाठी विमानतळ अधिकाऱ्यांना या पत्रातून निर्देश देण्यात आले आहेत.

१३ वर्षे काम करूनही बिरसी येथील नागरिकांना विमानतळ प्रशासनाने कामावरून कमी केले आहे. आपल्याला पुन्हा कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी येथील सुरक्षा रक्षक मागील दीड महिन्यांपासून विमानतळ गेट समोर आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत आंदोलनाला बसलेले आहेत. या आंदोलनाची अद्यापही दखल जिल्हा व विमानतळ प्रशासनाने घेतली नाही. एवढेच नव्हे तर या आंदोलनाला आतापर्यंत जिल्ह्यातील आमदार, खासदार तसेच अनेक संघटनांच्यावतीने भेटी देऊन समर्थन देण्यात आले. परंतु अद्यापही सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांसंदर्भात तोडगा काढण्यात आला नाही. हा प्रश्न तातडीने मार्गी लावून त्याची सोडवणूक करावी व सुरक्षा रक्षकांवर झालेला अन्याय दूर करावा अशी मागणी सुरक्षा रक्षकांनी पंतप्रधान कार्यालयाकडे केली होती. तसेच जिल्हा व विमानतळ प्रशासन सुरक्षा रक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अपयशी ठरत असल्यामुळे त्यांनी राष्ट्रपतींकडे इच्छा मृत्यूची मागणी सुद्धा केली होती हे विशेष. अखेर दीड महिन्यांनंतर प्रधानमंत्री कार्यालयाने या सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांची दखल घेत त्यांना ताबडतोब न्याय देण्यात यावा व या प्रश्नांची त्वरित सोडवणूक करावी असे निर्देश विमानतळ अधिकाऱ्यांना दिले आहेत. देशाच्या प्रमुख कार्यालयाने दिलेल्या आदेशानंतर विमानतळ व जिल्हा प्रशासनातील अधिकारी हे किती दिवसांत सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून देतात की प्रधानमंत्री कार्यालयाच्या पत्रालाही केराची टोपली दाखवितात याकडे लक्ष लागले आहे.

......