शहरं
Join us  
Trending Stories
1
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
2
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
3
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
4
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
5
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
6
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
7
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
8
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
9
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
11
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
12
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
13
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
14
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
15
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
16
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
17
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
19
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?

पूल झाले जीर्ण

By admin | Published: June 17, 2015 1:42 AM

येथून ८ किमी अंतरावर असलेल्या ग्राम हेटी (गिरोला) येथे मालगुजारी तलाव असून या तलावामुळे जवळपास १०० एकर

तीन वर्षांपासून दुर्लक्ष : पाण्याच्या प्रवाहामुळे पडले भगदाडसौंदड : येथून ८ किमी अंतरावर असलेल्या ग्राम हेटी (गिरोला) येथे मालगुजारी तलाव असून या तलावामुळे जवळपास १०० एकर शेती ओलिताखाली येते. तसेच वाल्मिक मच्छिमार सह संस्था म. गिरोला या संस्थेचे १२५ सभासद या तलावावर मासेमारी करुन आपला उदरनिर्वाह चालवितात. हेटी येथील शेतातून मुरदोलीच्या कालव्यातून येथे पाणी येते. कालव्यावरील पूल ४४ वर्ष जुना असून जीर्ण झाला आहे. शिवाय पुलावर मोठे भगदाड पडले असून संबंधितांचे दुर्लक्ष आहे.सदर तलावावर पाटबंधारे विभाग गोंदिया यांची देखरेख असून त्यावर शाखा अभियंता सौंदड यांचे नियंत्रण आहे. या तलावात येणारा पाण्याचा प्रवाह हेटी येथील शेतकऱ्यांच्या शेतात मुरदोलीवरुन येणाऱ्या कालव्यावरुन येत असतो. हा लोंढा येण्यासाठी कालव्यावर एक छोटेखानी पूल बांधण्यात आला आहे. परंतु या पुलाचे बांधकाम जवळपास ४४ वर्षे अगोदरचे असल्याने जीर्णावस्थेत आहे. त्यामुळे पुलाच्या वरच्या भागाला पाण्याच्या प्रवाहामुळे फार मोठे भगदाड पडले आहे. यावर्षी तलावात येणारे पाणी या भगदाडावाटे कालव्यात जाईल व कालव्यावाटे तो इतरत्र जाईल. त्यामुळे तलावात पाण्याचा साठा होणार नाही, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.या समस्येकडे मागील तीन वर्षांपासून या क्षेत्रातील पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व आमदार आदी पदाधिकाऱ्यांनी अजिबात लक्ष दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची भविष्यात गंभीर समस्या निर्माण होईल. तसेच मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांच्या रोजगार व उदरनिर्वाहाची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या तलावाचे गिरोला बाजूकडील तुडूम लिकेज असल्यामुळे तलावातील पाणी बेवारस वाहून जाते. तरी या गंभीर बाबीकडे उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग नवेगावबांध यांनी जातीने लक्ष घालून यथाशीघ्र या समस्येचे निराकरण करावे, अशी मागणी मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष तुळशीराम वलथरे व ईतर शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)अपघाताची शक्यता४पुलाच्या वरच्या बाजूला मोठमोठे खड्डे पडल्याने ये-जा करताना मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ४४ वर्षे जुन्या या पुलाची साधी डागडुजीसुद्धा करण्यात आली नाही. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे एखादा शेतकरी पुलावरील भगदाडात अडकण्याचीच अधिक शक्यता आहे. सदर पुलाचे नूतनीकरण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.