शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक प्रतापगड पहाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 11:52 PM

तालुक्यातील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक व प्राचीन महत्व असलेल्या प्रतापगड येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर मंगळवारपासून (दि.१३) भव्य यात्रेला सुरुवात होत आहे.

ठळक मुद्देसीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर : प्रशासनाची जय्यत तयारी

संतोष बुकावन ।आॅनलाईन लोकमतगोंदिया : तालुक्यातील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक व प्राचीन महत्व असलेल्या प्रतापगड येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर मंगळवारपासून (दि.१३) भव्य यात्रेला सुरुवात होत आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही लाखो भाविक कपाळावर मळकट, हातात त्रिशूल व मुखी ‘महादेवाला जातो गा’ चा गजर करीत भोलेनाथाचे दर्शन घेणार आहेत.यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून स्थानिक ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळी सुद्धा खा. प्रफुल्ल पटेल यांच्यावतीने मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमी तथा माजी खा. नाना पटोले मित्र परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.प्रतापगड भोलेनाथाचे तिर्थस्थान आहे. तसेच हजरत ख्वाजा उस्मान गनी हारुणी बाबाचा दर्गा आहे. त्यामुळे हे तिर्थस्थळ हिंदू-मुस्लिम बांधवाच्या एकतेचे श्रद्धास्थान असून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे. येथे उंच पहाडावर महादेवाचे मंदिर व भोलेनाथाची विशाल मूर्ती आहे. एकीकडे महादेवाचे दर्शन तर दुसरीकडे अल्लाच्या दर्ग्यावर चादर चढवून आपली मनोकामना पूर्ण करण्याचा दूहेरी योग भााविकांना लाभत आहे. यात्रास्थळी गुन्हेगारी व गैरप्रवृत्तींना आळा बसण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.प्रतापगडला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. मराठे राजे रघुजी भोसले यांच्या अधिपत्याखाली वैनगंगा प्रांतात प्रतापगड होता, असा इतिहास आहे. भोसले यांनी १७४३ च्या सुमारास राजखानला शिवजीचा दिवान म्हणून नियुक्त केले होते. तेव्हा राजखानचा मुलगा महंमद खान याने प्रतापगडचा कारभार सांभाळला. प्रतापगड येथील प्राचीन नक्षीदार बालाजी खांब हा मराठा संस्कृतीचा तर येथे असलेला हजरत ख्वाजा उस्मान गणी हारुनी बाबाचा दर्गा मुस्लीम संस्कृतीची साक्ष देतात.एवढ्याच याचा इतिहास नाही तर पेंढाऱ्यांच्या होत असलेल्या त्रासापासून जनतेचे रक्षण करण्यासाठी येथे किल्ला बांधण्यात आला. आजही किल्ल्याचे भग्नावशेष व पहाडावर मोठ्या हौदाचे बांधकाम दिसून येते. यावरुन वैनगंगा प्रांतातील प्रतापगड एकेकाळी समृद्ध, संपन्न व मानवजातीचे वास्तव्य असलेला महत्वाचे केंद्र असावा, असे लक्षात येते. किल्ला जरी भग्नावस्थेत असला तरी येथे असलेल्या दऱ्या व पळवाटा आजही कुतुहल वाढविणाऱ्या आहेत.या प्राचीन प्रतापगड स्थळाला महाराष्ट्र शासनाने सन २००१ मध्ये पर्यटन स्थळाचा दर्जा दिला. या स्थळाचा कायापालट करण्याच्या दृष्टीने तत्कालीन आमदार व माजी खासदार नाना पटोले यांनी प्रयत्न केले. रस्ते, भक्तनिवास, पहाडावर चढण्यासाठी पायऱ्या असा चौफेर विकास केला. सोबतच २००२-०३ च्या सुमारास पहाडावर भोलेनाथाची विशाल मूर्ती स्थापन केली व महाप्रसादाचे आयोजन सुरू केले.तसेच राज्यसभा सदस्य प्रफुल पटेल यांनीही लाखोंचा निधी देवून दोन्ही तिर्थक्षेत्रांचा विकास केला. तसेच मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या वतीने महाप्रसाद सुरू केला. या विभागाचे आमदार तथा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी या दोन्ही तिर्थक्षेत्रांचा कायापालट करण्याचा विडा उचलला असून पर्यटन विकासाच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी आणूण विकास केला आहे. यापूर्वी बडोले यांनी यात्रेसंदर्भात नियोजन समितीची बैठक घेवून सर्व सोयी पुरविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.प्रतापगडच्या ऐतिहासिक यात्रेला यावर्षी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल, माजी खा. नाना पटोले, वर्षा पटेल, माजी आ. राजेंद्र जैन यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी भोलेनाथाचे दर्शन घेवून दर्ग्यावर चादर चढविणार आहेत.१३ फेब्रुवारीपासून सुरु होणाºया महाशिवरात्रीयात्रेसह हजारो भाविक व पर्यटक जवळच असलेल्या तिबेटियन बौद्ध संस्कृती, बंगाली संस्कृती, इटियाडोह धरण, नवेगावबांध राष्टÑीय उद्यान, बोंडगावदेवीची गंगा-जमुना माता व अल्लाचे दर्शन घेतात व नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आनंद लूटतात.प्रतापगडमध्ये ऊर्सनिमित्त अल्लाचा गजर, दुय्यम कव्वाली, महाशिवरात्री यात्रेसोबत १४ फेब्रुवारीपासून ५२ व्या सालाना ऊर्स शरीफनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. दुपारी शाही संदल काढण्यात येणार आहे. यावेळी विविध धर्मातील मान्यवर व भाविक दर्ग्यावर चादर चढविणार आहेत. १५ फेब्रुवारीला विविध कार्यक्रमानंतर रात्री ९ वाजता बंगलुरू येथील प्रख्यात कव्वाल मुराद आतिश व मुंबईचे दानिश इकबाल साबरी यांची कव्वाली होणार आहे.प्रतापगडच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी मंजूरराज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात हे ऐतिहासिक प्रतापगड येत आहे. त्यामुळे शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून प्रतापगड तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी ४ कोटी ८८ लाख ४१ हजारांच्या निधीला ६ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या शासन निर्णयाने मंजुरी मिळाली आहे. तसेच ५० लाखांचा निधी तातडीने देण्यात आला आहे. या निधीमधून प्रसाधन गृह, उपहार गृह, संरक्षण भिंत, प्रवेशद्वार व सिक्युरिटी कॅबीन, लॉन, गार्डन, जमीन विकास, वाहनतळ, पदपथ, पाईप लाईन, पोहोच रस्ता, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण, ४ हायमास्ट लाईट आदी विकास कामांचा समावेश आहे.