शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: भाजपच्या दोन बड्या नेत्यांची मुले शिवसेनेच्या तिकिटावर लढणार?; शिंदेभेटीमुळे भुवया उंचावल्या
2
राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार, कारण...; मध्य प्रदेशचं उदाहरण देत पडळकरांनी सांगितलं गणित
3
उद्धव ठाकरे-भाजपा पुन्हा एकत्र येणार?; संजय राऊतांनी एका वाक्यातच पाणउतारा केला
4
PAK vs AUS : पाकिस्तानला सुखद धक्का! भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूची माघार
5
स्वतःसाठी पक्ष बदलता, मराठा आरक्षणासाठी काय केलं? शिंदे गटाच्या आमदाराला वृद्धाचा सवाल
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:तिसऱ्या आघाडीची पहिली यादी झाली जाहीर; बच्चू कडूंसह या नेत्यांना उतरवले मैदानात
7
दुबईमध्ये अनेक पादचाऱ्यांवर करण्यात आली दंडात्मक कारवाई, समोर आलं असं कारण?
8
30-40 जागांचा वाद! शरद पवार, उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन मार्ग काढू; नाना पटोलेंची स्पष्टोक्ती
9
विधानसभा नाही, लोकसभेवेळच्या एकमेकांवरील परोपकारावरून ठाकरे-काँग्रेसचे जागावाटप अडले? नेमके काय घडले...  
10
भारत-चीनमधील सीमावाद संपणार! दोन्ही देशांमध्ये LAC वर गस्तीबाबत झाला महत्त्वाचा करार
11
उद्धव ठाकरे दोन आमदारांचे तिकीट कापणार? पक्षफुटीवेळी राहिले होते सोबत; 'मातोश्री' गाठली
12
Elon Musk यांनी आणलाय Dream Job! घर बसल्या दर तासाला मिळतील ₹5000, करावं लागेल फक्त एवढं काम
13
कल्याण पूर्वेत महायुतीचा वाद विकोपाला; महेश गायकवाड निवडणूक लढण्याच्या तयारीत
14
करवा चौथसाठी पती घरी उशिरा आल्याने वाद, पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल, पतीनेही संपवलं जीवन
15
Hero ची 'शुभ मुहूर्त' ऑफर, स्कूटर खरेदीवर मिळतील 15000 रुपयांचे बेनिफिट्स!
16
माय-लेकीच्या जोडीची कमाल! ५ हजारांत सुरू केली कंपनी; आज महिन्याला लाखोंची कमाई
17
Jio Vs Vi: पाहा जिओ आणि व्हीआयचा ६६६ रुपयांचा प्लॅन; कोणता घेण्यात तुमचा जास्त फायदा?
18
श्वेता शिंदेने साजरी केली करवा चौथ, पती आहे प्रसिद्ध हिंदी अभिनेता, तुम्ही पाहिलंत का?
19
माँटी इंग्लंडमध्ये, गोल्डी कॅनडात, लखा पोर्तुगालमध्ये... लॉरेन्स बिश्नोईचे साथीदार कोणत्या देशात लपलेत?
20
"सलमान खानला मारण्यासाठी गार्डसोबत मैत्री..."; बिश्नोई गँगच्या शूटरचा मोठा खुलासा

साथरोगाचा उद्रेक रोखण्यासाठी आरोग्य विभाग झाला सज्ज

By admin | Published: July 05, 2015 2:08 AM

पावसाळा सुरू झाल्याने पावसाळ्यात साथरोग पसरते. साथरोगावर मात करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.

गोंदिया : पावसाळा सुरू झाल्याने पावसाळ्यात साथरोग पसरते. साथरोगावर मात करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. या साथरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ४० हजार मेडीक्लोर मागविण्यात आल्या आहेत. साथरोगाच्या उपयोगात येणाऱ्या २१ प्रकारच्या १५० औषधीचा साठा प्रत्येक उपकेंद्रात उपलब्ध करण्यात आला आहे. पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य आजार होत असतात. डायरीया, डिसेंट्री, काविळ, टायफाईड, गेस्ट्रो व कॉलरा असे आजार होत असतात. या आजरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. रूग्णांना सेवा देण्यासाठी २४ तास रूग्णवाहीकेची सोय, २४ तास फोन सेवा, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात, तालुकास्तरावर तसेच जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष, उपचाराला त्वरीत प्रतिसाद देण्यासाठी शिघ्र प्रतिसाद पथक (रेपीड रिस्पॉन्स टीम) नेमन्यात आले आहे. पावसाळ्यात सर्वात जास्त पाण्यामुळे आजार उदभवत असल्यामुळे जलसुरक्षा करण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात बैठक घेण्यात आली आहे. ग्राम पंचायतींंनी ब्लिचींग पावडरची सोय पुरेपूर करून ठेवाव्यात अश्या सूचना मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या मार्फत खंडविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या साथरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी मागबाईल युनिट, जिल्हा भरारी पथक तयार केले आहे. पाण्याचे नमुने तपासणे, दूषित पाण्याच्या नमुन्यांची माहिती संबधितांना देणे, पाण्याच्या तपासणीनंतर त्यांना लाल, हिरवा, पिवळा असे कार्ड देणे, बंद पडलेली, तुटलेली गटारे वाहती करणे, नळगळत्या व्हाल्ॅव्हगळत्या, नळ दुरूस्त करणे, परिसर स्वच्छता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यातील ५५६ ग्राम पंचायतीनंचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात ३२१ ग्रा पंचायतींना हिरवे कार्ड, २३४ गावांना पिवळे कार्ड तर गोरेगाव तालुक्याच्या पुरगाव ग्राम पंचायतीला लाल कार्ड देण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)फवारणीसाठी १२ चमूहिवतापाला आळा घालण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील ४२६ गावाची निवड करण्यात आली आहे. आदिवासी भागातील या गावात फवारणीचा पहिला टप्पा १ जून तग १२ आॅगस्ट पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. ४२६ गावात तीन लाख १६ हजार ५६३ लोक राहात आहेत. एका चमूत सहा माणसे मिळून १२ चमूत ७२ फवारणी कामगार लावण्यात आले आहे. उर्वरीत सात असे एकूण ७९ कर्मचारी फवारणीसाठी आहेत. मच्छरदाण्या १० वर्षापासून नाहीतआदिवासी जनतेला डासांपासून संरक्षण करण्यासाठी मच्छरदाण्या देण्याचा शासनाचा उपक्रम होता. मात्र सन २००५ पासून शासनाने आदिवासी जनतेला मच्छरदाण्या पुरविल्या नाहीत. यावर्षी पुन्हा या मच्छरदाण्या मिळण्याची आशा हिवताप नियंत्रण विभागाला आहे.