शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 4:30 AM

इसापूर : कोरोना संक्रमणामुळे देशात व राज्यात आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. मागील वर्षभरापासून अनेकांचा रोजगार हिरावला आहे. कारखान्यात ...

इसापूर : कोरोना संक्रमणामुळे देशात व राज्यात आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. मागील वर्षभरापासून अनेकांचा रोजगार हिरावला आहे. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची नोकरी गेल्याने त्यांना घरी बसण्याची वेळ आली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून बचत केलेले पैसेसुद्धा शिल्लक राहिले नाहीत.

महिलांनी बचत केलेले पैसे व बँकेत जमा असलेले पैसे काढून दैनंदिन व्यवहार करत आहेत. पण सद्य:स्थितीत बचत केलेले पैसे व बँकेत जमा असलेले पैसेसुद्धा शिल्लक नसल्याने दैनंदिन व्यवहार कसा करावा, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. हाताला रोजगार नाही, गळ्याला गाठी व हाताला माती नाही अशी अवस्था सर्वसामान्य नागरिकांची झाली आहे. शासनाने व लोकप्रतिनिधींनी कोरोना काळात नागरिकांना काम नाही म्हणून तीन महिने रेशन कार्डवर धान्य दिले. तर मागील एक वर्षापासून पेट्रोल व डिझेलवर महिना पंधरा दिवसांत २-२ रुपये वाढ करून पेट्रोलचे दर प्रति लीटर १०० रुपयांवर गेले आहेत. सत्तेत असलेले लोकप्रतिनिधी व विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी स्वयंपाकाच्या गॅसचे दर व डिझेल, पेट्रोलची भाववाढ झाल्याचे सांगत आहेत. मात्र या भाववाढीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्यास तयार नाहीत. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे संसाराचा गाडा कसा चालवावा, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

.....

खाद्य तेलाचे दर १६० रुपये प्रति लीटर

दैनंदिन वापरात येणाऱ्या खाद्य तेलाचे भाव नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात ७० रुपये होते. ते भाव आज १६०-१७० रुपये प्रति लीटर झाले आहेत. पूर्वी खाद्य तेलाचे एक टिन १२००-१३०० रुपयांना मिळत होते. त्याला आज २१०० रुपये मोजावे लागत आहेत. वाढत्या महागाईच्या विरोधात बोलण्यास शासन व विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या तोंडून एकही शब्द निघत नाही.

......

गॅस सिलिंडरच्या दराने बिघडले बजेट

कोरोना संक्रमणामुळे मागील एक वर्षापासून केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक होते, पण तसे केले नाही. उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत केंद्र सरकारने १०० रुपयांत महिलांना सिलिंडर देऊन स्वत:ची वाहवा करून घेतली. पण गॅस सिलिंडरचे दर ९०० रुपयांवर पोहोचले आहेत. गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने महिला स्वयंपाकासाठी गॅसचा वापर न करता चुलीवर स्वयंपाक करताना दिसत आहेत. तर गृहिणींचे बजेट बिघडले असून खर्चाचा ताळमेळ जुळविताना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे.