शहरं
Join us  
Trending Stories
1
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
2
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
3
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
4
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
5
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
6
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
7
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
8
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
9
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
10
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
11
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
12
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
13
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
14
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
15
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
16
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
17
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
18
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
19
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
20
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान

जिल्ह्यातील प्रकल्प लबालब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:24 AM

मागील वर्षीची नाराजी दूर करीत यंदा पावसाने जिल्ह्यावर आपली मेहरबानी दाखविल्याचे दिसून येत आहे. यंदा भरभरून पाऊस बरसल्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पाण्याने लबालब आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील चार मोठे प्रकल्प वगळले तरिही अधिकांश लघु, मध्यम व मालगुजारी तलावही फुल्ल झाले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यावर पावसाची मेहरबानी : लघु, मध्यम प्रकल्प व तलावही फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षीची नाराजी दूर करीत यंदा पावसाने जिल्ह्यावर आपली मेहरबानी दाखविल्याचे दिसून येत आहे. यंदा भरभरून पाऊस बरसल्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पाण्याने लबालब आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील चार मोठे प्रकल्प वगळले तरिही अधिकांश लघु, मध्यम व मालगुजारी तलावही फुल्ल झाले आहेत. अशात येत्या दिवसांत आणखी पाऊस बरसल्यास उरलेले प्रकल्प व तलावही भरणार यात शंका दिसत नाही.मागील वर्षी पावसाने नाराजी दाखविली होती. परिणामी जिल्ह्यात दुष्काळ पडला होता. शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी कधी नव्हे ते पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. कमी पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प व तलावांत ठणठणाट होता. यंदाही पाऊस दगा तर देणार नाही ना अशी भिती होती. मात्र हवामान खात्याने यंदा वर्तविलेला अंदाजही खरा ठरला व जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील चार मोठ्या प्रकल्पांत भरभरून पाणीसाठा आहे. यात इटियाडोह प्रकल्पात आजघडीला ६६.२८ टक्के, सिरपूर प्रकल्पात ६३.७८ टक्के, पुजारीटोला प्रकल्पात ९५.५९ टक्के तर कालीसराड प्रकल्पात ९४.८२ टक्के एवढा पाणीसाठा आहे.या चार मुख्य प्रकल्पांची ही स्थिती असतानाच जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पांतील बोदलकसा, मानागड, रेंगेपार, संग्रामपूर व कटंगी हे पाच प्रकल्प १०० टक्के भरलेले आहेत. तर चुलबंद प्रकल्पात ६९.८२ टक्के, खैरबंधा प्रकल्पात ९०.०५ टक्के व कलपाथरी प्रकल्पात ९८.८२ टक्के पाणासाठा आहे. तसेच २२ लघु प्रकल्पांतील डोंगरगाव, गुमडोह, कालीमाती, मोगरा, पिपरीया, पांगडी, राजोली, सोनेगाव, जुनेवानी व बेवारटोला हे १० प्रकल्प १०० टक्के भरलेले आहेत. तर आक्टीटोला प्रकल्पात ८८.८५ टक्के, हरी ९२.२१, रेहाडी ८२.२३, सडेपार ७६.३५, सेरपार ७१.२७, वडेगाव ९३.९३, उमरझरी ९५.८३ टक्के पाणीसाठा आहे. त्याचप्रकारे, जिल्ह्यातील ३८ मालगुजारी तलावांतील भानपूर, चान्नाबाक्टी, फुलचूर, गंगेझरी, कवठा, कोहलगाव, खैरी, खमारी, काटी, मालीजुंगा, मुंडीपार, मेंढा, मोरगाव, माहुरकुडा, पळसगाव सौं, पालडोंगरी, पळसगाव डव्वा, पुतळी, सौंदड, तेढा या २० तलावांत १०० टक्के भरलेले आहेत. शिवाय उर्वरीत तलावांतील बहुतांश तलाव ५० टक्केच्यावर भरलेले आहेत.यंदा रबीचा हंगाम होणारमागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे प्रकल्पांत पाणीसाठा नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रब्बीसाठी पाणी न देण्याचे आदेश काढले होते. त्यामुळे खरिपाचा हंगाम हातून गेल्यानंतर रबीचा हंगामही शेतकऱ्यांना घेता आला नव्हता. यंदा मात्र चांगला पाऊस झाला असून आता उर्वरीत काही दिवसांत आणखी पाऊस झाल्यास पाणीसाठ्यात आणखी वाढ होणार असे बोलता येईल. असे झाल्यास रबीचा मार्ग मोक ळा होणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

टॅग्स :Waterपाणी