शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

केशोरी येथील मुख्य रस्त्यावर तयार झाले डबके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:20 AM

पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहून न जाता, डांबरीकरण निघालेल्या भागात पाणी साचून राहत असल्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांसह वाहन ...

पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहून न जाता, डांबरीकरण निघालेल्या भागात पाणी साचून राहत असल्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांसह वाहन चालकांना अडचण जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. केशोरी गावामधून अर्जुनी मोरगाव तालुक्याला जाण्यासाठी या एकच मार्गाचा जास्त उपयोग होत असल्याने, रात्रंदिवस या मार्गाने नागरिक तथा वाहने धावत असतात. या रस्त्यावरील डांबरीकरणाचा स्तर उखडून खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साचून राहत आहे. बऱ्याच कालावधीपर्यंत या खड्ड्यात पाणी साचून राहत असून, त्यापासून चिखल तयार होत आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर चिखल उडून कपडे खराब झाल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन किमान रस्त्यावर मुरुम टाकून तात्पुरते खड्डे बुजविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

..............