शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

जंगलाला रोजगाराचे साधन करण्याचे उद्दिष्ट

By admin | Published: June 27, 2017 1:06 AM

गोंदिया हा वनाच्छादित जिल्हा आहे. ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनतर्फे राज्यात १२.५ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

परिणय फुके : ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनच्या वृक्षदिंडीचा स्वागत समारंभलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया हा वनाच्छादित जिल्हा आहे. ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनतर्फे राज्यात १२.५ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्यत गेल्या काही वर्षापासून उष्णतेत वाढ होत असल्यामुळे जिल्ह्यातील वृक्ष लागवड करुन या उष्णतेला कमी करणे गरजेचे झाले आहे. मात्र वृक्ष लावनेच गरजेचे नसून त्यांचे संगोपन करणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. एक वृक्ष दिवसाला २१ हजार रुपये किंमतीच्या टँकची आॅक्सीजन देतो असे सिद्ध झाले आहे. पर्यावरणाची परतफेड करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अख्या महाराष्ट्रात २५ टक्के वनक्षेत्र असून त्याला ३३ टक्के करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट शासनाने ठरविले असून या वनापासून रोजगार निर्मिती करण्याचे शासनाने ठरविले आहे. पुढील काळात वन हे रोजगाराचे साधन असण्याचे शासनाचे प्रयत्न राहणार असे प्रतिपादन डॉ. परिणय फुके यांनी केले.१ जुलै ते ७ जुलै या कालावधीत चार कोटी वृक्षारोपण करण्याची मोहीम महाराष्ट्र शासनाच्यावतीने हाती घेण्यात आली आहे. या प्रसंगी वृक्षदिंडी काढण्यात येत आहे. याप्रसंगी गोंदिया वनविभागाद्वारे स्थनिक जयस्तंभ चौकात ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनच्या वृक्षदिंडीचा स्वागत समारंभ व वनमहोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार अनिल सोले, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनोद अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, न.प. उपाध्यक्ष शिव शर्मा, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, बबलू मेश्राम, भाजप शहर अध्यक्ष सुनील केलनका आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार फुके यांनी, वनक्षेत्रात वाढ झाल्यास त्याचे अनेक फायदे भविष्यात दिसून येणार. आतापर्यंतच्या शासनाच्या धोरणात इंडस्ट्री आणून रोजगाराचे स्वप्न दाखविले जात होते. मात्र यात अपयशच आले आहे. करिता शासनाने जंगलक्षेत्रात वाढ करुन यापासून रोजगार निर्मिती करण्याची मोहीम सुरू करण्याचे ठरविले आहे. जंगलापासून जास्त लोकांना रोजगार मिळू शकतो आणि यात खर्चही इंडस्ट्री उभारण्याच्या तुलनेत कमी येणार आहे. याकरिता लोकांना प्रशिक्षण देवून रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. लोक इंडस्ट्री पाहून आनंदी होत नाही मात्र जंगलाला पाहून आनंदी होतात याकरिता पुढे जंगलात रोजगार निर्मितीचे शासनाने ठरविले असल्यचेही सांगीतले.