शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
4
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
5
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
6
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
7
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
8
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
9
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
10
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
11
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
12
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
13
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
14
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
15
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
16
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
17
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
18
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
19
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
20
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

पथदिव्यांची वीज जोडणी त्वरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:20 AM

आमगाव : वीज वितरण कंपनीकडून गावातील पथदिव्यांची वीज जोडणी कापली जात असल्याने रात्रीला गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ...

आमगाव : वीज वितरण कंपनीकडून गावातील पथदिव्यांची वीज जोडणी कापली जात असल्याने रात्रीला गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अशात पथदिव्यांची जोडणी त्वरित करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी सरपंच सेवा संघाच्यावतीने पालकमंत्री नवाब मलिक यांना निवेदन देण्यात आले आहे.

तालुका सरपंच सेवा संघाच्यावतीने गावातील पथदिव्यांची जोडणी आणि इतर विविध समस्यांसंदर्भात पंचायत समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सभेत वीज महावितरणने कपात केलेली पथदिव्यांची जोडणी त्वरित करावी व थकीत वीज देयक राज्य सरकारने वहन करावे. तसेच मनरेगाच्या कुशल आणि अकुशल कामांची देयके जनतेला त्वरित देण्यात यावीत. संगणक ऑपरेटरला देण्यात येणारे मानधन हे वित्त आयोगातून न देता शासनाने ग्रामपंचायतीच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे यांना द्यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांचेमार्फत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. तसेच पालकमंत्री नवाब मलिक आणि आमदार विनोद अग्रवाल यांना सुद्धा देण्यात आले. यावर येत्या पावसाळी अधिवेशनात तोडगा काढला जाईल, असे आश्वासन नामदार मलिक यांनी दिले आहे.

शिष्टमंडळात तालुका सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष सरपंच सुनील ब्राम्हणकर, नरेंद्र शिवणकर, हंसराज चूटे, सुनंदा ऊके, सुनील खोब्रागडे, गोदावरी हत्तीमारे, प्रमिला चकोले, दुर्गेश पटले, राजकुमार चव्हाण, नामदेव दोनोडे, लखन भलावी, भेजलाल पटले, सरिता डोये, उपसरपंच ललित ठाकूर यांचा समावेश होता.

-----------------------

दिला आंदोलनाचा इशारा

वीज कंपनीने जोडणी कापल्याने गावात अंधार असून आता पावसाळ्यात गावातील जनतेला रहदारी करण्यास त्रास होत आहे. तसेच विषारी साप व कीटकांपासून धोका निर्माण झाला आहे. अशात गावातील जनतेला कोणत्याही अप्रिय घटनेला सामोरे जावे लागल्यास यासाठी सर्वस्वी जिल्हा परिषद आणि सोबतच महावितरण कंपनीला जबाबदार धरले जाईल. करिता कपात केलेली पथदिव्यांची जोडणी त्वरित पूर्ववत करण्यात यावी, अन्यथा सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.