शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

पाच महसूल मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 22:18 IST

रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी पहाटेपर्यंत कायम होता. काही भागात चांगला पाऊस झाला. जिल्ह्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.यात खमारी ६७ मि.मी., परसवाडा ६७, कट्टीपार ७४, आमगाव ६६.२० आणि ठाणा महसूल मंडळात ६७.४० मि.मी.पावसाची नोंद झाली.

ठळक मुद्देप्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ : घरांची पडझड, रोवण्यांना संजीवनी, बळीराजा सुखावला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने मंगळवारी (दि.२७) जिल्ह्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची तर जिल्ह्यात सरासरी २६.४८ मि.मी.पावसाची नोंद झाली.पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ झाली असून रोवण्यांना सुध्दा संजीवनी मिळाल्याने बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे.रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी पहाटेपर्यंत कायम होता. काही भागात चांगला पाऊस झाला. जिल्ह्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.यात खमारी ६७ मि.मी., परसवाडा ६७, कट्टीपार ७४, आमगाव ६६.२० आणि ठाणा महसूल मंडळात ६७.४० मि.मी.पावसाची नोंद झाली.तीन दिवस झालेल्या पावसामुळे गोरेगाव आणि आमगाव तालुक्यात आठ ते दहा घरांची पडझड झाली.त्यामुळे नागरिकांना नुकसान सहन करावे लागले.पावसाचा जोर कायम असला तरी जून आणि जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने अद्यापही तूट कायम आहे. यंदा पावसाला उशीराने सुरुवात झाल्याने रोवणीची कामे लांबली होती. आॅगस्ट महिन्याच्या सुरूवातीला रोवणीच्या कामाला वेग आला. रोवणी केल्यानंतर आठ दहा दिवसांच्या कालावधीत पावसाची गरज असते.यामुळे पिकांची चांगली वाढ होते.जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रोवणी केलेल्या धान पिकांना संजीवनी मिळाली.त्यामुळे बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे. पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात सुध्दा वाढ झाली आहे. तर सिंचन प्रकल्पात ५० टक्क्यांवर पाणीसाठा असल्याने पाणी टंचाईचा प्रश्न सुध्दा मार्गी लागला आहे. 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती