शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
3
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
4
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
5
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
6
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
7
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
8
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
9
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
10
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
11
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
12
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
13
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
14
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
15
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
16
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
17
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
18
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
19
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
20
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम

पाण्याचे कोट्यवधी रूपये शेतकऱ्यांवर बाकी

By admin | Published: June 28, 2017 1:23 AM

शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचावे व त्यांनी दुसरे पीकसुद्धा घ्यावे. पहिल्या पिकासाठीसुद्धा शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये,

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचावे व त्यांनी दुसरे पीकसुद्धा घ्यावे. पहिल्या पिकासाठीसुद्धा शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये, याच उद्देशाने जलसंपदा विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या पाणी वितरण संस्थांचा निर्माण करण्यात आला. या संस्थांच्या माध्यमातून पाण्याचे वितरण शेतकऱ्यांना केले जात आहे. परंतु शेतकरी पाण्याचे कर भरत नसल्याने त्यांच्यावर १६ कोटी ९० लाख ९६ हजार रूपयांचे पाणी कर बाकी आहे. जिल्ह्यात वाघ व इटियाडोह विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात सहजतेने पाणी पोहोचावे यासाठी पाणी वितरण संस्था तयार करण्यात आल्या. या संस्थांच्या माध्यमातून पाणी वितरणाची व्यवस्था योग्यरित्या चालविली जात आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ दरम्यान वाघ विभागाने सिंचनासाठी उपलब्ध केलेल्या पाण्याचा कर २८.३२ लाख रूपये वसूल केले आहे. गैरसिंचन सुविधेसाठी देण्यात आलेल्या पाण्याचे कर ६.१६ लाख रूपये वसूल करण्यात आले आहे. या विभागाचे शेतकऱ्यांवर नऊ कोटी १५ लाख ५७ हजार रूपये एवढी रक्कम बाकी आहे. त्यातच इटियाडोह विभागाने सिंचनासाठी उपलब्ध करून दिलेल्या पाण्याचे कर एक कोटी नऊ लाख ६१ हजार रूपये वसूल केले आहे. गैरसिंचनासाठी उपलब्ध केलेल्या पाण्याचे कर १३.६१ लाख रूपये आहे. इटियाडोह विभागाच्या पाण्याचे कर शेतकऱ्यांवर सात कोटी ७५ लाख ३९ हजार रूपये बाकी आहे. वाघ व इटियाडोह दोन्ही विभागांचे पाणी कर १६ कोटी ९० लाख ९६ हजार रूपये बाकी आहे. केवळ आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्येच नव्हे तर अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांवर या विभागांची बाकी रक्कम प्रलंबित पडून आहे. पाणी तर घ्यावे मात्र त्याचे कर भरू नये, अशी शेतकऱ्यांची मानसिकताच बनली आहे. विशेष म्हणजे पाणी वितरणाच्या सहकारी संस्थांना याच्या वसुलीचे अधिकार देण्यात आले आहेत व वसुलीच्या रकमेतून अर्धी रक्कम संबंधित संस्थांनाच वितरित केली जात आहे. ही रक्कम त्या संस्थांच्या विकासासाठी उपलब्ध केली जात आहे. शेतकऱ्यांना पाण्याचे कर भरण्यास सांगितले जात आहे. परंतु पर्याप्त रक्कम मिळत नसल्याने पाणी वितरण संस्थांनासुद्धा लाभ मिळत नाही. शासकीय योजनांना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी समस्या निर्माण होत आहे. जास्तीत जास्त कराची रक्कम भरावी, अशी शेतकऱ्यांना विनंती आहे. एच.वाय. छप्परघरे, कार्यकारी अभियंता, वाघ व इटियाडोह सिंचन विभाग, गोंदिया.