शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
2
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
3
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
4
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
5
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
6
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
7
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
8
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
9
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
10
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
11
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
12
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
13
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
14
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
15
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
16
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
17
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
18
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
19
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
20
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल

पावसाअभावी रोवणीला पडल्या भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 12:56 AM

मागील पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने रोवणी झालेल्या शेतीला भेगा पडल्या आहेत. तर पावसाअभावी धान करपण्याच्या मार्गावर आहे. १४ आॅगस्टला झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

ठळक मुद्देशेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत : तालुक्यात दुष्काळ सदृश स्थिती, पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : मागील पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने रोवणी झालेल्या शेतीला भेगा पडल्या आहेत. तर पावसाअभावी धान करपण्याच्या मार्गावर आहे. १४ आॅगस्टला झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र आता धान भरण्याच्या स्थितीत असताना पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी संकटात आले आहेत.जिल्ह्यातील बहुतांश शेती निसर्गावर अवलंबून आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी,धानोरी, बेहळीटोला, थाडेझरी, बोळुंदा, मुरपार, लेंडेझरी, चिचटोला, मुंडीपार या गावातील शेतकरी मागील पंधरा दिवसांपासून पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. कोसमतोंडी, धानोरी, बोळुंदा, थाडेझरी, बेहळीटोला येथे मागील वर्षीसुद्धा दुष्काळी परिस्थिती होती. या गावातील शेतकऱ्यांनी ८० टक्के धानाची रोवणी केली नव्हती. मात्र या शेतकऱ्यांना शासनाने कुठलीच नुकसान भरपाई दिली नाही.यावर्षी या गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने धानाची रोवणी केली. मात्र पावसाने पुन्हा दगा दिल्याने मागील वर्षी सारखेच यावर्षी पुन्हा दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागणार नाही ना, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावित आहे. सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांसह कोरडवाहू शेतकऱ्यांनी रोवणीची कामे लगबगीने पूर्ण केली.सुरूवातीला झालेल्या संततधार पावसामुळे शेतकरी सुखावले होते. लवकर धानाचे पीक जोमदार यावे, यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खताचे डोजही दिले. परंतु मागील पंधरा दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने धानपिकांवर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.वाढत्या तापमानामुळे धानाच्या बांध्या कोरड्या पडत असून धान वाळत असल्याचे चित्र आहे. शेतातील रोवणीला भेगा पडू लागल्या आहेत. त्यामुळे येत्या आठ दहा दिवसात पाऊस न झाल्यास दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.सिंचन प्रकल्पांवर भिस्तसध्या हलके धान निघण्याच्या मार्गावर आहे तर जड धानाला एका पाण्याची गरज आहे. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे. ते शेतकरी धानाला पाणी देत आहे. तर धानपिके संकटात आल्याचे पाहून सिंचन प्रकल्पातील पाणी सोडले जात आहे. मात्र शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याची ओरड आहे. तर काही शेतकऱ्यांची भिस्त पूर्णपणे या सिंचन प्रकल्पांवर असल्याचे चित्र आहे.शेतकऱ्यांची दिशाभूलमागील वर्षी कोसमतोंडी, धानोरी, बोळुंदा, थाडेझरी, बेहळीटोला या पाच गावात ८० टक्के धानाची रोवणी पावसाअभावी झाली नव्हती. या गावातील शेतकऱ्यांनी अनेकदा तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. त्यानंतर या पाच गावातील सर्वे करण्याचे निर्देश तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना देण्यात आले. मात्र तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी शेतीचे पंचनामे शेतशिवारात जाऊन न करता टेबलावर बसून सर्वे करुन शासनाकडे पाठविले. यामध्ये शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीपासून शेतकरी वंचित राहिले.कर्मचाऱ्यांवर कारवाहीची मागणीमहसूल आणि कृषी विभागाच्या चुकीच्या अहवालामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील अनेक शेतकºयांना नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कारवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस