शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
2
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
4
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
5
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
6
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
7
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
8
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
10
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
12
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
13
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
15
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
16
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
17
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
18
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
19
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
20
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य

१० व्या ऑपरेशन मुस्कानमध्ये सात बालकांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:19 AM

गोंदिया : बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या माता-पित्यांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने ऑपरेशन मुस्कान ...

गोंदिया : बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या माता-पित्यांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने ऑपरेशन मुस्कान अभियान राबविण्यात आले. गोंदिया जिल्हा पोलिसांनी १० व्या ऑपरेशन मुस्कानमध्ये सात बालकांचा शोध घेऊन या बालकांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

मुलांच्या हातून भीक मागण्यासाठी लहान बालकांचे अपहरण करून मोठ्या शहरात नेले जाते. त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून भीक मागितली जाते. काहींना वाम मार्गाकडे वळविले जाते. १८ वर्षांखालील मुला-मुलींच्या बेपत्ता किंवा अपहरणाचे प्रमाण पाहून राज्य शासन या बालकांना शाेधून त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ ही मोहीम राबवित आहे. या ऑपरेशनसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात १ अधिकारी व २ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पोलीस आपापल्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील बसस्थानक, रुग्णालये, उद्यान, चौक, रेल्वेस्थानक व सार्वजनिक ठिकाणी फिरस्ते किंवा भीक मागणाऱ्या मुलांशी संपर्क साधतात. त्या बालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणेला स्वयंसेवी संस्थांचीही मदत मिळणे अवश्य आहे. १ ते ३० जून या महिन्याभरात राबविलेल्या १० व्या ऑपरेशन मुस्कानमध्ये सात बालकांना शोधण्यात गोंदिया पोलिसांना यश आले आहे. आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत दोन मुली, गोंदिया शहर एक मुलगा, गोरेगाव दोन मुली, गंगाझरी दोन मुली अशा सातजणांचा शोध घेण्यात आला आहे. या १० व्या ऑपरेशन मुस्कानला यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूल यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस हवालदार भुवन देशमुख व जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

..................

त्यांचे जीवन फुलायला हवे

बेपत्ता किंवा अपरहण झालेल्या बालकांना त्यांच्या माता-पित्याच्या स्वाधीन करण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ राबविण्यात येते. परंतु ऑपरेशन मुस्कानमध्ये जी बालके सापडतात आणि त्यांचे आई-वडील नाहीत किंवा असतील तर ते सांभाळायला तयार नसतील, अशा बालकांना सुधारगृहात टाकले जाते. त्यांची स्थिती या अभियानानंतरही तशीच राहते. त्यांचे जीवन फुलविण्यासाठी शासनाने ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे.