शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

वर्षभरात सहा हजार वृक्षांची कत्तल

By admin | Published: April 13, 2016 1:55 AM

वाढत्या ग्लोबल वार्मिंगच्या समस्येमुळे शासनाने पर्यावरण ग्राम संतुलित योजना अंमलात आणली.

नरेश रहिले गोंदियावाढत्या ग्लोबल वार्मिंगच्या समस्येमुळे शासनाने पर्यावरण ग्राम संतुलित योजना अंमलात आणली. त्या माध्यमातून एकीकडे झाडे लावली जात आहेत, तर दुसरीकडे वनातील झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे. वर्षाकाठी २५ हजारांच्या वर झाडांची अवैधरित्या कत्तल होत आहे. मात्र वनविभागाकडून अधिकृतपणे कत्तल झालेल्या झााडांची संख्या कमी दाखविली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१५ या कालावधीत ६ हजारच्या घरात विविध झाडांची कत्तल झाल्याची अधिकृत नोंद वनविभागाने घेतली आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील या अवैध वृक्षकटाईवर कोण आळा घालणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.गोंदिया जिल्ह्यात १२ वनक्षेत्र आहेत. यापैकी देवरी, सडक-अर्जुनी व चिचगड या तीन वनपरिक्षेत्रात सर्वात जास्त अवैध वृक्षतोड करण्यात आली आहे. गोंदिया वनक्षेत्रांतर्गत २९८ झाडांची कत्तल करण्यात आली. तिरोडा ५६८, गोरेगाव ३३९, आमगाव १३४, सालेकसा ४३८, देवरी (उत्तर) ६७०, देवरी (दक्षिण) ४०६, चिचगड ६७७, सडक-अर्जुनी ६८२, नवेगावबांध ६६३, गोठणगाव २५८, अर्जुनी-मोरगाव ५५७ झाडांची कत्तल करण्यात आली. वर्षभरात जिल्ह्यातील ५ हजार ६९० वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचे वनविभाग सांगते. परंतु मोठ्या प्रमाणात कत्तल झालेल्या वृक्षांची नोंदच वनविभाग घेत नाही. नागरिकांच्या लक्षात येणाऱ्या झाडांची कत्तल झाल्यास आणि त्याची तक्रार आली तरच चौकशी करून त्याच झाडांची कत्तल झाली असे वनविभाग नोंद करते. परंतु अनेक ठिकाणची झाडे कापल्यानंतरही त्या झाडांची तक्रार वनविभागात नोंदविली जात नाही. त्या वनाची राखन करणारा वनपाल, वनरक्षक ते प्रकरण आपला हलगर्जीपणा दाखवेल असे म्हणून अनेक कत्तल झालेल्या वृक्षांची माहिती वनविभागाला देत नाही. वनाधिकारी व वनमाफियांच्या संगणमताने वृक्षतोड सुरूच आहे. गोंदिया शहरात येणारा माल पकडण्यासाठी काही वर्षापूर्वी वनविभागाने वनउपज तपासणी नाके तयार केले होते. परंतु अनेक वनउपज तपासणी नाके बंद करण्यात आले. याचाच अर्थ चोरीची लाकडे पकडण्यात येऊ नये यासाठी वनविभागानेच हे वनउपज तपासणी नाके बंद केल्याचे दिसून येते. १०२३ सागवान झाडांची कत्तलसागवानाच्या लाकडांची अधिक किंमत असल्याने वर्षभरात जिल्ह्यातील १०२३ सागाच्या झाडांची अवैध कत्तल झाली आहे. त्यातही देवरी व सडक-अर्जुनी तालुका आघाडीवर आहे. गोंदिया वनविभागात ३९, तिरोडा ६८, गोरेगाव ११६, आमगाव ३८, सालेकसा ११५, देवरी (उत्तर) १२७, देवरी (दक्षीण) ४५, चिचगड ४८, सडक-अर्जुनी १६०, नवेगावबांध ११२, गोठणगाव ३४, अर्जुनी-मोरगाव १२१ सागवानाच्या झाडांची कत्तल करण्यात आली. त्या झाडांची किंमत १० लाख ४० हजार ५१७ रूपये सांगितली जाते. दाखल तक्रारीचे प्रमाण ५० टक्केजंगलातील लाकडे चोरीला गेल्याची तक्रार वनविभागाकडे केली तरी चोरट्यांकडून तो माल हस्तगत करण्याचे धाडस वनाधिकारी करीत नसल्याने चोरीला गेलेल्या मालाची जप्ती करण्याचे प्रमाण फक्त ५० टक्के आहे. गोंदिया वनविभागातील ८९ हजार ३२ रूपयांचा माल चोरीला गेल्याची नोंद आहे. मात्र २९.७७ टक्केच वसुली झाली आहे. तिरोडा वनविभागातील एक लाख ५४ हजार १९० रूपयांचा माल चोरीला गेला, तर ३९.२८ टक्के वसुली झाली आहे. गोरेगाव वनविभागातील एक लाख ८४ हजार ५८३ रूपयांचा माल चोरी गेला असताना ५८.१३ टक्के वसुली झाली आहे. आमगाव वनविभागातील ६२ हजार ४९१ रूपयांचा माल चोरीला गेल्याची नोंद आहे. मात्र १८.८२ टक्के वसुली झाली आहे. सालेकसा वनविभागातील ३ लाख ३० हजार ६७४ रूपयांच्या चोरीच्या मालाची ६५.८९ टक्के वसुली झाली आहे. देवरी (उत्तर) वनविभागातील २ लाख ७२ हजार २६५ रूपयांचा माल चोरीला गेला, मात्र ५७.९४ टक्के वसुली झाली आहे. देवरी (दक्षिण) वनविभागातील एक लाख ६५ हजार १०८ रूपयांचा माल चोरी गेला असताना केवळ ४२.१८ टक्के वसुली झाली आहे. चिचगड वनविभागातील २ लाख ३१ हजार ३२० रूपयांच्या मालाच्या चोरीपैकी ६०.८९ टक्के मालाची वसुली झाली आहे. सडक-अर्जुनी वनविभागातील ३ लाख ५४ हजार २५८ रूपयांचा मालापैकी ३८.८७ टक्के वसुली झाली आहे. नवेगावबांध वनविभागातील दोन लाख २ हजार ९०७ रूपयांचा मालापैकी ६०.४४ टक्के वसुली झाली आहे. गोठणगाव वनविभागातील एक लाख ७२ हजार ९०६ रूपयांचा माल चोरीला गेला, तिथे ४६.५५ टक्के वसुली झाली आहे. अर्जुनी-मोरगाव वनविभागातील एक लाख ५५ हजार ५४८ रूपयांचा माल चोरी गेला असताना केवळ २८.४९ टक्के वसुली झाली आहे. जिल्ह्यातील वनविभागाचे वसुलीचे प्रमाण ४९.५७ टक्के आहे.