शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

दुधात भेसळ सुरूच

By admin | Published: June 12, 2017 1:30 AM

या धावपळीच्या युगात जो तो कमीत कमी श्रम करुन लवकर कसे श्रीमंत होता येईल यासाठी धडपडत असल्याचे चित्र दिसत आहे.

दुर्लक्ष : अन्न व औषध प्रशासन विभागाचेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: या धावपळीच्या युगात जो तो कमीत कमी श्रम करुन लवकर कसे श्रीमंत होता येईल यासाठी धडपडत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र अधिक नफा मिळविण्याच्या भारात आपण आपल्याच लोकांच्या जीवनाशी खेळ करित आहोत ही बाब कदाचित विसरली जात आहे. दैनंदिन जिवनात प्रत्येकाची गरज असलेल्या दुधामध्ये रासायनिक द्रव्यांची भेसळ केली जात असल्याचे प्रकार अनेकदा सामोर आले आहे. मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येते. दूध हा प्रत्येकाच्या दैनंदिन वापरातील पदार्थ आहे. प्रत्येकाच्या दिवसाची सुरूवात देखील दुधापासून तयार केलेल्या चहानेच होते. तसेच डॉक्टर देखील आजारी असलेल्या रुग्णांना व लहान मुलांना दूध पिण्याचा सल्ला देतात. दुधामध्ये असलेले प्रथिने मानवी आरोग्यकरिता लाभदायक असतात.दुधाच्या पावित्रामुळेच दुधाला पुजा, होमहवन यामध्ये उपयोग केला जातो. मात्र सध्या मिळणाऱ्या दुधाच्या शुध्दीकरणावर त्यातील भेसळीमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आपण दररोज सेवन करित असलेल्या दुधामध्ये प्रथिने कमी व भेसळ युक्त पदार्थांचा वापर अधिक प्रमाणत केल्या जात असल्याचे प्रकार बऱ्याच ठिकाणी उघडकीस आले आहे. काही दूध विक्रेत्यांनी दुधामध्ये भेसळ करुन विक्री करण्याला आपला व्यवसाय केला आहे. हा व्यवसाय करताना आपण आपल्याच लोकांच्या जीवनाशी खेळ करित असल्याची बाब ही ते विसरत चालले आहे. अन्न औषध व प्रशासन विभागाने जिल्ह्यात अनेक दूध डेअरी व खोवा तयार करणाऱ्यांवर धाड टाकून दोन तीन हजार किलो भेसळयुक्त खोवा जप्त केला होता. तर गोंदिया शहरातील एका दूध विक्रेत्यांच्या घरी शहर पोलिसांनी धाड टाकून हजारो लिटर भेसळ युक्त दूध जप्त केले होते. सदर दुधविक्रेत्यांच्या घरून सॉकरीन, मॉल्टोवेट पावडर, कपडे धुण्याचे पावडर,शॉम्पू, फोटो धुण्याचे रसायनाचा मोठ्या प्रमाणात साठा सापडला होता. सदर दूध विक्रेत्याने हे सर्व पदार्थ दुधामध्ये भेसळ करित असल्याचे सांगितले होते. या पदार्थाच्या भेसळीमुळे दुधाची डिग्री व फॅट वाढविली जाते. याचबरोबर यामध्ये युरिया मिक्स करुन रासायनिक दूध देखील तयार केले जाते.हे रासायनिक दूध शुध्द दुधासारखे दिसते व त्याची चव देखील सारखीच असते. त्यामुळे कुणीही सदर दूध भेसळयुक्त असल्याची कल्पना करु शकत नाहीत. दुधामध्ये या रासानिक पदार्थांची भेसळ केल्याने दूध विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळते व रासानिक पदार्थांची किमत देखील कमी असल्याने आणि ते बाजारपेठेत सहज उपलब्ध होत असल्याने मोठ्या प्रमाणात दुधाची भेसळ केली जाते. हा प्रकार जिल्ह्यातही अजुनही बिनधास्तपणे सुरूच आहे. मात्र असे एखादे प्रकरण उघडकीस आले की अन्न औषध व प्रशासन विभाग त्यांच्यावर कारवाई करते. मागील पाच ते सहा महिन्याच्या कालावधीत एकाही दूध विक्रेत्यावर कारवाई करण्यात आल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे दूधभेसळ खोरांची हिम्मत वाढत चालली आहे. मात्र यामुळे मानवी आरोग्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. आपण नकळत जहर सेवन करित आहोत याची थोडीशी कल्पनाही या भोळ्या लोकांना नसते. दुधामध्ये भेसळ करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.