शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वादळी पावसाचा ३०० एकरातील पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:08 IST

जिल्ह्यात रविवारी दुपारच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाचा रब्बी पिके आणि फळाबागांना सर्वाधिक फटका बसला. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार वादळी पावसामुळे तिनशे एकरमधील पिकांचे नुकसान झाल्याची बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देफळबागांचे सर्वाधिक नुकसान : कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज

आॅनलाईन लोकमतगोंदिया : जिल्ह्यात रविवारी दुपारच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाचा रब्बी पिके आणि फळाबागांना सर्वाधिक फटका बसला. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार वादळी पावसामुळे तिनशे एकरमधील पिकांचे नुकसान झाल्याची बाब पुढे आली आहे. सर्वेक्षणानंतर या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.हवामान विभागाने रविवारी (दि.१२) विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस व गारपिटीचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज खरा ठरला. विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात रब्बी पिके आणि फळाबागांचे नुकसान झाले. जिल्ह्यात रब्बी हंगामात धान, हरभरा, गहू या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पावसाअभावी मागील खरीप हंगामात शेतकºयांना हाती आलेले पिके गमावावी लागली. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. खरीपात झालेले नुकसान रब्बी पिकाची लागवड करुन भरुन काढू अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र रविवारी झालेल्या वादळी पावसाचा गहू, हरभरा, धान या पिकांना फटका बसल्याने त्यांच्या आशेवर पाणी फेरल्या गेल्या. वादळी पावसामुळे शेतातील गव्हाचे पीक झोपून गेले. जिल्ह्यात यंदा २४ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. यात गहू, धान, लाखोळी, हरभरा, मक्का या पिकांचा समावेश आहे. तीनशे ते चारशे एकरवर पपई, अ‍ॅपल बोर यांच्या फळबागा आहेत. वादळी पावसामुळे फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणात जिल्ह्यातील तिनशे एकरातील पिकांचे नुकसान झाल्याची बाब पुढे आली. राज्याचे कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांनी कृृषी विभागाला वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर कृषी विभागाने सोमवारपासून (दि.१३) सुरूवात केली आहे. आठवडाभरात नुकसानीचा अहवाल शासनाला सादर केला जाणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.९६ घरांची पडझडजिल्ह्यात रविवारी (दि.१२) झालेल्या वादळी-पावसामुळे ९६ घरांची पडझड झाली. अनेक ठिकाणी गुरांचे गोठे व घरावरील टिनाचे छप्पर उडाल्याची माहिती आहे. जिल्हा आपत्तीनिवारण विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण करण्यास सुरूवात केली असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.