शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

धान बुडविणाऱ्या राईस मिलर्सवर फौजदारी कारवाई करा

By admin | Published: October 05, 2015 1:59 AM

धान उत्पादक पट्ट्यात आदिवासी विकास महामंडळाकडून भरडाईकरिता घेतलेला कोट्यवधी रुपयांचा धान भरडाई करून न देणाऱ्या राईस मिलर्सवर फौजदारी कारवाई करा,

खासदारांची मागणी : मुख्यमंत्र्यांसह आदिवासी विकास मंत्र्यांकडे कैफियतगोंदिया : धान उत्पादक पट्ट्यात आदिवासी विकास महामंडळाकडून भरडाईकरिता घेतलेला कोट्यवधी रुपयांचा धान भरडाई करून न देणाऱ्या राईस मिलर्सवर फौजदारी कारवाई करा, अशी मागणी गडचिरोली-गोंदिया जिल्ह्याचे खासदार तथा भाजपाच्या आदिवासी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक नेते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याकडे केली. गोंदियात शनिवारी रात्री ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.देवरी, आमगावमधील कार्यक्रम आटोपून गोंदियात आले असताना खा.नेते यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, आदिवासी विकास महामंडळाने राईस मिलर्सना धान भरडाई करण्यासाठी देताना तेवढ्या धानाची अनामत रक्कम भरून घेणे गरजेचे आहे. मात्र महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने मिलर्सकडून कोणतीही अनामत रक्कम न घेता त्यांना ४०० ते ५०० कोटी रुपयांचा धान भरडाईसाठी दिल्याचे खा.नेते म्हणाले. राईस मिलर्सने अजूनपर्यंत तो धान भरडाई करून दिला नाही. त्यात गोंदिया जिल्ह्यातील राईस मिलर्स सर्वाधित आहेत. वास्तविक त्या धानाची रक्कम मिलर्सकडून व्याजासह वसूल करणे गरजेचे आहे. एवढेच नाही तर आदिवासी विकास महामंडळाची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि त्या राईस मिलर्सवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आपण केली असल्याचे खा.नेते यांनी सांगितले.गोदामांअभावी आदिवासी विकास महामंडळाला शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धान दरवर्षी उघड्यावर टाकावा लागतो. तो धान नंतर खराब होऊन कवडीमोल भावात विकावा लागतो. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. याकडेही नेते यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.महामार्गाच्या विकासाचे गोंदिया-गडचिरोली जिल्ह्यातून जाणार असून पाच महामार्ग चारपदरी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नक्षलग्रस्त गडचिरोली-गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगिन विकास कामांसाठी १२०० कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याचेही खा.नेते यांनी यावेळी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)आमगावात पुन्हा घेणार आढावाखा.अशोक नेते यांचे कार्यक्षेत्र असलेल्या आमगाव-देवरी-सालेकसा या तीन तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आणि कोणकोणत्या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करावे लागेल हे जाणून घेण्यासाठी खा.नेते यांनी शनिवारी आमगाव येथे आढावा बैठक आयोजित केली होती. पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित या बैठकीला मात्र २६ विभाग प्रमुखांनी दांडी मारली. त्यामुळे नेते यांनी त्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांना दिले. सोबतच ही बैठक रद्द करून पुन्हा आमगावात आढावा बैठक घेणार असल्याचे सांगितले.