शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

तलाठ्यांचे लेखणीबंद आंदोलन सुरु

By admin | Published: April 10, 2016 2:07 AM

आपल्या विविध मागण्या संदर्भात सालेकसा तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी १ एप्रिल पासून काळीफित लावून काम सुरू केले आहे.

सालेकसा : आपल्या विविध मागण्या संदर्भात सालेकसा तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी १ एप्रिल पासून काळीफित लावून काम सुरू केले आहे. तरीही शासनाने तलाठ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तालुक्यातील एकूण १७ तलाठी व तीन मंडळ अधिकारी यांनी लेखणी बंद आंदोलन करीत तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.त्यामुळे सर्व तलाठी कार्यालय बंद आहेत. परिणामी शेतकऱ्यांसह सामान्य जनतेची कामे खोळबली आहेत.विविध मागण्या घेऊन तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी आंदोलन सुरु केले. त्यात तलाठी साज्यांची व महसूल मंडळाचे पुर्नरचना करणे, मंडळ अधिकारी कार्यालयाचे भाडे देणे, सातबारा संगणीकरण व ई-फेरफार मधील अडचणी दूर करणे, तलाठी मंडळ अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देणे, अवैध गौण खनीज वसूली या कामातून तलाठी संवर्गाला वगळणे, तलाठी कार्यालय महसूल विभागाने बांधून देणे, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करणे, सरळ सेवेची २५ टक्के पदे खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवणे, अंशदायी निवृत्ती वेतन योजना रद्द करणे व इतर मागण्यांना घेऊन तलाठ्यानी आपले लेखनी बंद आंदोलन सुरू केले. मागण्यांचे निवेदन तहसीलदार मार्फत शासनाला पाठविले आहे. या मागण्यासंदर्भात शासनाने चर्चा केली परंतु आतापर्यंत निर्णय घेतला नाही. जोपर्यंत निर्णय लागत नाही तो पर्यंत लेखणी बंद सुरू राहणार तसेच ११ एप्रिलनंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्याचा इशारा तलाठी संघटनेचे अध्यक्ष आर.एम. ठाकरे यांनी दिला आहे. या आंदोलनात मंडळ अधिकारी एन.बी. रघुवंशी, डी.टी. हत्तीमारे, के.बी. शहारे, तलाठी आर.एम. ठाकरे, आर.एस. ब्राह्मणकर, आर.एन. ताकडे, एन,ए. वालोदे, बी.सी. तुरकर, के.डी. बागडे, एस.आर. पंधरे, व्ही.टी. राऊत, टी.आर. बघेले, बी.डी. वरखडे, एम.एन. कळंबे, एच.ई. फटिंग, आर.एच. मेश्राम, आर.एन. गुप्ता, जी.बी. नागपुरे यांचा समावेश होता. (वार्ताहर)