शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीच्या दोन मुलींना हडपसरमध्ये दारु पाजली, मित्राच्या खोलीत चौघांकडून सामुहिक बलात्कार
2
महायुती अन् महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी 'महाशक्ती'; विधानसभेत तिहेरी सामना?
3
Sanjay Roy : "२ दिवसांनी संजय रॉयचे कपडे..."; CBI ने केला पोलिसांवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप
4
Andheri Lokhandwala Fire: अंधेरीत लोखंडवाला येथे भीषण आग, दोन बंगले जळून खाक
5
PM मोदींच्या अपमानाची आठवण, भाजपानं सुनावलं; जे.पी नड्डांचं खरगेंना खरमरीत पत्र
6
7 तास झोप घेत नसाल तर तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात! अकाली मृत्यू, हार्ट अटॅक, नैराश्य येण्याची भीती
7
भारताने पाकिस्तानला बजावली नोटीस; दहशतवाद, पर्यावरण बदलांमुळे सिंधू जलकराराचा फेरआढावा घ्या
8
टीव्ही-फ्रिज सगळ्यामध्येच होताहेत स्फोट, लेबेनॉनमधील रहिवासी दहशतीच्या छायेखाली
9
कोट्यवधींचं घबाड! रिटायर्ड IAS अधिकाऱ्याच्या लॉकरमध्ये सापडले २० कोटींचे हिरे, सोनं, कॅश
10
रेल्वे स्थानकांवरही सुरू होणार एक्झिक्युटिव्ह लाउंज, फक्त दोन रुपयांत मिळू शकते एंट्री!
11
Ion Exchange Share Price: 'या' कंपनीला Adani Power कडून मिळालं ₹१६१ कोटी रुपयांचं कंत्राट; शेअरनं पकडला रॉकेट स्पीड
12
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
13
IND vs BAN : गिलच्या पदरी भोपळा! Hasan Mahmud नं किंग कोहलीसमोरही फिरवली जादूची कांडी
14
एकाचवेळी तीन हजार पेजरस्फाेट, इस्रायलचा हिजबुल्लाह संघटनेवर टेक्नोसॅव्ही हल्ला;मोसाद गुप्तचर यंत्रणेने दाखविला हिसका
15
‘महाविकास’च्या जागावाटप चर्चेला सुरुवात; चर्चा सलग तीन दिवस सुरू राहणार
16
IND vs BAN : हिटमॅन Rohit Sharma चा पुन्हा फ्लॉप शो!  
17
धक्कादायक! उलट्या दिशेने धावली कोलकात्याहून अमृतसरला जाणारी ट्रेन, ड्रायव्हरला समजल्यावर...  
18
'बिग बॉस मराठी'साठी तरूण होस्ट हवा होता! केदार शिंदेंचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "महेशदादाला..."
19
देशात कसं लागू होणार 'एक देश, एक निवडणूक'; कॅबिनेट मंजुरीनंतर आता पुढे काय? जाणून घ्या
20
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी

सव्वाकोटीची पाणीपुरवठा योजना ठरली फाेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2022 5:00 AM

पालांदूर जमी हे गाव तालुक्यातील अतिदुर्गम गाव आहे. गावात सात ते आठ बोअरवेल आणि दोन-तीन विहिरी आहेत; पण यानंतरही येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जल जीवन मिशन योजना पालांदूर गावला मंजूर झाली; पण संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी या योजनेत जुन्याच पाइपलाइनला या योजनेची पाइपलाइन जोडली. या गावालगत असलेल्या चूलबंद नदीत निकृष्ट दर्जाची विहीर बांधल्याने गावकऱ्यांना आता पाणीटंचाईला  तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलोहारा : १ कोटी दहा लक्ष रुपयांचा निधी खर्चून जल जीवन मिशन ही योजना देवरी तालुक्यातील नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल ग्रामपंचायत पालांदूर जमी येथे मंजूर करण्यात आली. कंत्राटदार आणि संबंधित विभागाच्या दुर्लक्षित  धोरणामुळे गावकऱ्यांना या योजनेनंतरही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पालांदूर जमी हे गाव तालुक्यातील अतिदुर्गम गाव आहे. गावात सात ते आठ बोअरवेल आणि दोन-तीन विहिरी आहेत; पण यानंतरही येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जल जीवन मिशन योजना पालांदूर गावला मंजूर झाली; पण संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी या योजनेत जुन्याच पाइपलाइनला या योजनेची पाइपलाइन जोडली. या गावालगत असलेल्या चूलबंद नदीत निकृष्ट दर्जाची विहीर बांधल्याने गावकऱ्यांना आता पाणीटंचाईला  तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

अनामत रक्कम केली परत- ग्रामपंचायत पालांदूर जमीअंतर्गत १ कोटी १० लक्ष रुपये निधीची जल जीवन मिशन योजना कार्यान्वित करण्यात आली होती. या योजनेंतर्गत हर घर नल, हर घर जल या उद्दिड्टाची पूर्तता करण्यात आली; परंतु संबंधित कंत्राटदाराने व ग्रामपंचायतीने या योजनेची योग्य अंमलबजावणी न केल्याने ही योजना निष्फळ ठरली. मात्र, ग्रामविकास अधिकाऱ्याने  योजना सुरू असल्याचे दाखवून कंत्राटदाराची जमा असलेली १० लाख रुपयांची अनामत रक्कम परत केल्याची माहिती आहे. 

 गावकऱ्यांची केली दिशाभूल - या योजनेंतर्गत गावातीलच नळजोडणीधारकाच्या घरापर्यंत पाणी पोहोचलेच नाही. मात्र, ही योजना सुरळीत सुरू असल्याचे कागदोपत्री दाखवून गावकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. कंत्राटदाराने केलेल्या बोगस कामाची मौका तपासणी करून गावकऱ्यांना त्वरित पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.वर्षभरापासून योजना ठप्प - पालांदूर जमी येथील ग्रामपंचायतने पाचशे रुपये द्या नळ कनेक्शन देतो असे सांगत गावातील अनेक नागरिकांच्या घरी नळजोडणी केली. जल जीवन मिशन योजनेच्या नावाखाली केवळ दोन दिवस गढूळ पाण्याचा पुरवठा करण्यात आला. त्यानंतर नळ योजना बंद पडली. 

गावात एक कोटी दहा लक्ष रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. नदीवर बांधलेली विहीर बांधकाम करतानाच फुटली. त्याची दुरुस्ती करून नळ योजना सुरू झाल्याचे सांगितले. कंत्राटदार आणि ग्रामसेवकाने मिलीभगत करून  गावकऱ्यांची दिशाभूल केली. - द्वारकाप्रसाद गुप्ता, गावकरी कंत्राटदार आणि ग्रामपंचायतच्या दुलर्क्षित धोरणामुळे गावकऱ्यांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.  त्यामुळे या योजनेची चौकशी करून दाेषींवर कारवाई करण्यात यावी. -यशवंत गुरुनुले, गावकरी

 

टॅग्स :Waterपाणी