शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

औद्योगिकरण व विकासाच्या नावावर जंगलतोड झाली

By admin | Published: June 26, 2017 12:25 AM

संपूर्ण जमिनीच्या ३३ टक्के भुभागावर जंगल आवश्यक आहे. पूर्वी खूप मोठ्या प्रमाणावर जंगले होती.

अनिल सोले : वृक्षारोपण कार्यक्रम, लाभार्थ्याना गॅस वाटप लोकमत न्यूज नेटवर्क तिरोडा : संपूर्ण जमिनीच्या ३३ टक्के भुभागावर जंगल आवश्यक आहे. पूर्वी खूप मोठ्या प्रमाणावर जंगले होती. परंतु औद्योगिकरण व विकासाच्या नावाने जंगलतोड झाली. त्यामुळे आता महाराष्ट्रात २०.४४ टक्के जंगल राहीलेले आहे. त्यासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे, असे मत प्रा. आमदार अनिल सोले यांनी केले. तिरोडा येथे आलेल्या वृक्षदिंडीचे स्वागत करुन डॉ. छत्रपती दुबे नगर परिषद शाळेत आयोजीत वृक्षारोपणाच्या कार्यक्रम अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजय रहांगडाले, आमदार डॉ. परिणय फुके, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, उपाध्यक्ष सुनिल पालांदूरकर, फॉरेस्ट आॅफीसर शेंडे, कदम, मुख्याधिकारी विजयकुमार देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले उपस्थित होते. यावेळी शालेय परिसरात विविध प्रजातींच्या झाडांचे रोपण करण्यात आले. नंतर कार्यक्रमाचे छोट्या सभेत रुपांतर करण्यात आले. यावेळी गॅस कनेक्शनचे वितरण ही पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. गॅस एजेसीचे मालक प्रामुख्याने उपस्थित होते. आ. विजय रहांगडाले यांनी शहरात वृक्षांची संख्या कमी आहे. वृक्षारोपण व संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यासाठी नगराध्यक्ष व न.प.सदस्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असे सांगून राजकारणासोबतच समाजकारण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर आमदार फुके यांनी १ ते ७ जुलै दरम्यान मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक नगराध्यक्ष देशपांडे यांनी मांडले. संचालन जंगल विभागाचे पटले यांनी केले. आभार उपाध्यक्ष पालांदूरकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी नगर परिषद सभापती अशोक असाटी, नरेश कुंभारे, श्वेता मानकर, सदस्या राखी गुणेरिया, संतोष मोहने, विजय बंसोड, अनिता अरोरा, द्वारका भोडेकर, प्रभु असाटी, रश्मी बुराडे, भावना चवळे, ममता हट्टेवार, अजयसिंह गौर, जगदिश कटरे, किरण डहाटे तसेच न. प. अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले.